In this post ,I am going to explain Body cleansing process at home using WARISAR DHOUTI in yoga.You can read more information about it in MARATHI
1) वारीसार dhouti
मागील पोस्टमध्ये आपण वमन dhouti ची माहिती पहिली होती ।या पोस्टमध्ये वारीसार dhouti ची माहिती पाहणार आहोत
वारीसार dhouti स शंखप्रक्षालन असेही म्हणतात.
मुखापासून ते गुदद्वारापर्यंतचा संपूर्ण पचनमार्ग मोकळा व स्वछ करण्याचा हा उत्तम मार्ग व पर्याय आहे.
वारीसार dhouti कृती:--
१) एक बादली प्यायचे कोमट पाणी मीठ टाकून घ्या।
२)मन शांत व स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करा.
३)दोन ग्लास कोमट पाणी प्या
४) त्यानंतर ताडासान,तिर्यक ताडासान,कटी चक्रासन, तिर्यक भुजंगासन आणि उदराकर्षणासन या पाच आसनापैकी प्रत्येक आसन आठ-आठ वेळा करा.
अ) ताडासन:-
दोन्ही पायामध्ये अर्ध्या फुटाचे अंतर घेऊन ताठ उभे राहा.दोन्ही हाताचि बोटे एकमेकात गुंतवून चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा.शरीर वरील बाजूस खेचा.अशा खेचलेल्या स्थितीत। काही क्षण राहू द्या व हळूहळू मूळ स्थितीत या.
आ)तिर्यक ताडासन:--
सर्वप्रथम ताडासनामध्ये उभे राहा.पायाच्या टाचा जमिनीपासून वर उचला.शरीर प्रथम उजव्या बाजूस आणि नंतर डाव्या बाजूस झुकवा.
इ)कटी चक्रासन
दोन्ही पायामध्ये साधारणपणे 1-2 फुटाचे अंतर घेउन उभे राहा.दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत वर न्या आणि त्याच स्थितीत कमरेतून उजव्या बाजूस वळा. डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा.नंतर उजवा हात पाठीच्या मागे न्या.त्यानंतर शरीर पुन्हा मूळ स्थितीत आणा आणि अशीच क्रिया डाव्या बाजूला वळून करा
ई)तिर्यक भुजंगासन:-
जमिनीवर पालथे झोपून हाताचे पंजे खांद्याजवळ ठेवा.त्यानंतर धड व डोके वर उचला.डोके व धड उजव्या बाजूस वळवून पायाच्या टाचेकडे पहा .त्यानंतर डोके व धड डाव्या बाजूस वळवून उजव्या पायाच्या टाचेकडे पहा .यानंतर मूळ स्थितीत या.
उ) उदाराकर्षणासन
कृती : प्रथम दोन्ही गुडघे मुडपून जमिनीवर बसा.हाताचे पंजे दोन्ही गुडघ्यावर ठेवा. नंतर डावा गुडघा जमिनीवर टेकवा व उजवा गुडघा वर उचला.धड शक्य तितके उजव्या बाजूस वळवून उजव्या बाजूने मागे पहा .पुन्हा मूळ स्थितीत या ,त्यानंतर ह आसन दुसऱ्या बाजूनेही करा
वरील सांगितलेली पाचही आसने प्रत्येक बाजूला आठ-आठ वेळा करा
वर दिलेली आसने क्रमवार केल्याने लहान आतडे ,मोठे आतडे आणि गुदद्वारातील काही विशिष्ठ स्नायूंना हालचाल मिळाल्याने ते शिथिल होतात परिणामतः तोंडावाटे घेतलेले खारट पाणी पोटातील अन्न आणि मळ घेऊन गुदद्वाराकडे सरकू लागते.
पुन्हा दोन ग्लास पाणी प्या आणि वरील आसने आठ आठ वेळा करा .आसने करून झाल्यानंतर शौचालयात जाऊन बसा .मळ बाहेर यावा म्हणून जोर लावू नका.पोटातील स्नायू सैल सोडा .जर शौचास झाले नाही तर एखादा मिनिट वाट पाहून बाहेर या.
पुन्हा दोन ग्लास पाणी पिऊन वरील आसने आठ आठ वेळा करून पुन्हा शौचास जाऊन बसा, जोर लावू नका.शेवटी शौचास होऊ लागते. सुरुवातीस अगदी घट्ट व मग पातळ शौचास होईल.
पुनःपुन्हा पाणी पिऊन आसने करून शौचालयात जाऊन बसण्याने शेवटी पाणीच बाहेर येऊ लागेल . याचा अर्थ असा की तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतचा संपूर्ण मार्ग मोकळा झाला आहे .
हा। प्रयोग थकवा आणणारा आहे ,हा प्रयोग पूर्ण झाल्यानंतर ४०- ४५ मिनिटे शवासन करून पूर्ण विश्रांती घ्यावी
या प्रयोगामुळे होणारे फायदे:-
१) जीर्ण मलावरोध ,आम्लपित्त,वायू ,अपचन आणि पचनाच्या अन्य व्याधीवर हा प्रयोग रामबाण उपाय आहे
२)रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते,त्यामुळे हा प्रयोग मधुमेहिंसाठी उपयुक्त आहे
३)पचनसंस्थेचे अवयव सुदृढ बनून त्यांची कार्यक्षमता वाढते.
हा प्रयोग करताना घ्यायची काळजी;:-
१) हा प्रयोग अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा
२)प्रातर्विधी आटोपल्यानंतर रिकाम्या पोटी करावा
३) पोटात किंवा आतड्यामध्ये व्रण असेल,उच्च रक्तदाब असेल,मूत्रपिंडाची किंवा रुधिराभिसरण संस्थेच्या काही व्याधी असतील तर ,हा प्रयोग अनुभवी योग् शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा
४) या प्रयोगानंतर एका तासाने हलका आहार घ्यावा
________________________________________
1) वारीसार dhouti
मागील पोस्टमध्ये आपण वमन dhouti ची माहिती पहिली होती ।या पोस्टमध्ये वारीसार dhouti ची माहिती पाहणार आहोत
वारीसार dhouti स शंखप्रक्षालन असेही म्हणतात.
मुखापासून ते गुदद्वारापर्यंतचा संपूर्ण पचनमार्ग मोकळा व स्वछ करण्याचा हा उत्तम मार्ग व पर्याय आहे.
वारीसार dhouti कृती:--
१) एक बादली प्यायचे कोमट पाणी मीठ टाकून घ्या।
२)मन शांत व स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न करा.
३)दोन ग्लास कोमट पाणी प्या
४) त्यानंतर ताडासान,तिर्यक ताडासान,कटी चक्रासन, तिर्यक भुजंगासन आणि उदराकर्षणासन या पाच आसनापैकी प्रत्येक आसन आठ-आठ वेळा करा.
अ) ताडासन:-
दोन्ही पायामध्ये अर्ध्या फुटाचे अंतर घेऊन ताठ उभे राहा.दोन्ही हाताचि बोटे एकमेकात गुंतवून चित्रात दाखवल्याप्रमाणे कृती करा.शरीर वरील बाजूस खेचा.अशा खेचलेल्या स्थितीत। काही क्षण राहू द्या व हळूहळू मूळ स्थितीत या.
आ)तिर्यक ताडासन:--
सर्वप्रथम ताडासनामध्ये उभे राहा.पायाच्या टाचा जमिनीपासून वर उचला.शरीर प्रथम उजव्या बाजूस आणि नंतर डाव्या बाजूस झुकवा.
इ)कटी चक्रासन
दोन्ही पायामध्ये साधारणपणे 1-2 फुटाचे अंतर घेउन उभे राहा.दोन्ही हात खांद्याच्या समांतर रेषेत वर न्या आणि त्याच स्थितीत कमरेतून उजव्या बाजूस वळा. डावा हात उजव्या खांद्यावर ठेवा.नंतर उजवा हात पाठीच्या मागे न्या.त्यानंतर शरीर पुन्हा मूळ स्थितीत आणा आणि अशीच क्रिया डाव्या बाजूला वळून करा
ई)तिर्यक भुजंगासन:-
जमिनीवर पालथे झोपून हाताचे पंजे खांद्याजवळ ठेवा.त्यानंतर धड व डोके वर उचला.डोके व धड उजव्या बाजूस वळवून पायाच्या टाचेकडे पहा .त्यानंतर डोके व धड डाव्या बाजूस वळवून उजव्या पायाच्या टाचेकडे पहा .यानंतर मूळ स्थितीत या.
उ) उदाराकर्षणासन
कृती : प्रथम दोन्ही गुडघे मुडपून जमिनीवर बसा.हाताचे पंजे दोन्ही गुडघ्यावर ठेवा. नंतर डावा गुडघा जमिनीवर टेकवा व उजवा गुडघा वर उचला.धड शक्य तितके उजव्या बाजूस वळवून उजव्या बाजूने मागे पहा .पुन्हा मूळ स्थितीत या ,त्यानंतर ह आसन दुसऱ्या बाजूनेही करा
वरील सांगितलेली पाचही आसने प्रत्येक बाजूला आठ-आठ वेळा करा
वर दिलेली आसने क्रमवार केल्याने लहान आतडे ,मोठे आतडे आणि गुदद्वारातील काही विशिष्ठ स्नायूंना हालचाल मिळाल्याने ते शिथिल होतात परिणामतः तोंडावाटे घेतलेले खारट पाणी पोटातील अन्न आणि मळ घेऊन गुदद्वाराकडे सरकू लागते.
पुन्हा दोन ग्लास पाणी प्या आणि वरील आसने आठ आठ वेळा करा .आसने करून झाल्यानंतर शौचालयात जाऊन बसा .मळ बाहेर यावा म्हणून जोर लावू नका.पोटातील स्नायू सैल सोडा .जर शौचास झाले नाही तर एखादा मिनिट वाट पाहून बाहेर या.
पुन्हा दोन ग्लास पाणी पिऊन वरील आसने आठ आठ वेळा करून पुन्हा शौचास जाऊन बसा, जोर लावू नका.शेवटी शौचास होऊ लागते. सुरुवातीस अगदी घट्ट व मग पातळ शौचास होईल.
पुनःपुन्हा पाणी पिऊन आसने करून शौचालयात जाऊन बसण्याने शेवटी पाणीच बाहेर येऊ लागेल . याचा अर्थ असा की तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतचा संपूर्ण मार्ग मोकळा झाला आहे .
हा। प्रयोग थकवा आणणारा आहे ,हा प्रयोग पूर्ण झाल्यानंतर ४०- ४५ मिनिटे शवासन करून पूर्ण विश्रांती घ्यावी
या प्रयोगामुळे होणारे फायदे:-
१) जीर्ण मलावरोध ,आम्लपित्त,वायू ,अपचन आणि पचनाच्या अन्य व्याधीवर हा प्रयोग रामबाण उपाय आहे
२)रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते,त्यामुळे हा प्रयोग मधुमेहिंसाठी उपयुक्त आहे
३)पचनसंस्थेचे अवयव सुदृढ बनून त्यांची कार्यक्षमता वाढते.
हा प्रयोग करताना घ्यायची काळजी;:-
१) हा प्रयोग अनुभवी योग शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा
२)प्रातर्विधी आटोपल्यानंतर रिकाम्या पोटी करावा
३) पोटात किंवा आतड्यामध्ये व्रण असेल,उच्च रक्तदाब असेल,मूत्रपिंडाची किंवा रुधिराभिसरण संस्थेच्या काही व्याधी असतील तर ,हा प्रयोग अनुभवी योग् शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावा
४) या प्रयोगानंतर एका तासाने हलका आहार घ्यावा
________________________________________
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.