सावित्रीबाई फुले
भारतातील पहिली
शिक्षिका,मुलींच्या शिक्षणासाठी समाजाचा रोष पत्करणारी ,समाजाकडून शेणगोळे दगडगोटे आणि वाईट बोलणे इ.चा त्रास सहन
करणारी आणि मुलींच्या शिक्षणासाठी ध्यास घेतलेली माऊली म्हणजे क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले !
सुमारे दीडशे वर्षापूर्वी
स्त्रियांना शिकायला मनाई होती .’मुलीना कशासाठी शिकवायचं ?काय करणार मुली शिकून
?असे लोक म्हणत असत .अशा प्रतिकूल काळात मुलीना शिकवण्यास्ठी सावित्रीबाई फुले
घराबाहेर पडल्या .त्या काळातील लोकांना हे सहन झाले नाही .त्यांनी त्रास द्यायला
सुरुवात केली .
मुलींच्या शिक्षणाला
मनाई असण्याच्या काळात सावित्रीबाईना त्यांचे पती महात्मा जोतीरावानी
लिहायला-वाचायला शिकवले .त्यांना वाचनाची गोडी लागली.त्या सुंदर कविता लिहू
लागल्या. भाषणेही देऊ लागल्या .महात्मा जोतीराव फुले यांच्या प्रेरणेतून त्या
साक्षर झाल्या .
‘शिक्षण घेतले कि
ज्ञान मिळते .शिकल्यामुळे माणूस विचार करू लागतो आणि स्वत:ची परिस्थिती बदलवू
शकतो’, असा महात्मा फुले यांचा ठाम विश्वास होता .
‘शिक्षणामुळे
माणसाचे पशुत्व नाहीसे होऊन त्याला मनुष्यत्व प्राप्त होते ‘, असे सावित्रीबाईचे
मत होते.
महात्मा फुले यांनी
पुण्याच्या बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मुली
शिकल्या तर समाजाची प्रगती लवकर होईल,असे महात्मा फुले यांचे मत होते.सावित्रीबाई
त्या शाळेत मुलीना शिकवू लागल्या ,त्यामुळे मुलींची संख्या वाढू लागली .फातिमा शेख
या त्यांच्या सहकारी शिक्षिका होत्या .
महात्मा फुले यांनी
जातीभेद पाळला नाही. स्वत:च्या वाड्यातील आडाचे
पाणी त्यांनी दलितांसाठी खुले करून दिले .अनाथ मुलांना माया दिली .सावित्रीबाई
हयातभर ,पतीच्या निधनानंतरही मुलींचे शिक्षण आणि समाजकार्य जोमाने पुढे चालवले .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.