https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

मदर तेरेसा

मदर तेरेसा

     भारतरत्न विजेत्या आणि नोबेल शांतता पुरस्कर विजेत्या मदर तेरेसा एक भारतीय रोमन काथोलिक नन होत्या.त्यांचे जन्माचे नाव Anjeze Gonxhe bojaxhiu असे असून त्यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० रोजी अल्बानिया येथे झाला .
     मदर तेरेसा म्हणते ‘हिंदुनो अधिक चांगले हिंदू बना ,मुस्लिमांनो अधिक चांगले मुस्लीम बना आणि ख्रिश्चनांनो अधिक चांगले ख्रिश्चन बना’ असा सर्वधर्मीयांकडून आग्रह धरतात .
     इ.स. १९७९ मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला तेव्हा आणि इ.स.१९८० मध्ये त्यांना भारतरत्न हा  किताब देण्यात आला ,तेव्हाही त्या म्हणाल्या होत्या ,कि मला दिव्याच्या लखलखाटात जायला अजिबात आवडत नाही .
     मदर तेरेसा धाडसी होत्या.बैरुतला वेढा पडलेला असताना त्यांनी इ.स. १९८२ मध्ये पलेस्टेनियन बंडखोर आणि इस्रायली सैनिक यांच्यात तात्पुरता समझोता घडवून आणून रेडक्रॉसच्या मदतीने ३७ लहान मुलांची सुटका घडवून आणली .त्या स्वत: युद्धभूमीवर हिंडल्या.पूर्व युरोप ज्या वेळी अधिक मोकळा व्हायला लागला होता ,त्यावेळी त्यांनी कम्युनिस्ट देशांमध्ये मिशनरीज ऑफ चरीटीचा  प्रसार केला . 
     इथीपोयामधल्या भुकेलेल्यांना त्यांनी आधार दिला.त्या तिथे गेल्या ,ज्या काळात च्रनोबिलच्या किराणोत्सर्गाची घटना घडली तेव्हाही आपल्याला त्याचा त्रास होईल किंवा नाही याची चिंता करत बसण्यापेक्षा त्यांनी तिथे जाऊन ज्यांना तो त्रास झाला त्यांना आधार दिला .

     मदर तेरेसा याचा मृत्यू १९९७ साली झाला .

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...