इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या
महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा जन्म १९ नोवेंबर १९१७ रोजी अलाहाबाद या ठिकाणी
झाला. जवाहरलाल आणि कमला या नेहरू दांपत्याच्या
या एकमेव अपत्य होत्या. मुळात नेहरू हे
काश्मिरी पंडित होते. इंदिरांचे आजोबा मोतीलाल नेहरू व्यवसायाने वकील आणि भारतीय
राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे आघाडीचे नेते होते .भारताच्या राजकारणात त्यांना
मानाचे स्थान होते .ते स्वरुपराणी यांच्याशी विवाह करून अलाहाबाद मध्ये स्थायिक
झाले.जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण इंग्लंड मध्ये झाले .पुढे ते भारतीय स्वातंत्र्य
लढ्यातले अतिशय लोकप्रिय व्यक्तिमत्त्व बनले तसेच स्वंतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले
For video Click here
इंदिरा गांधी यांनी स्वातंत्र्य चळवळीत लहानपणापासूनच भाग घेतला .वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी त्यांनी स्वातंत्र्य सैनिकांच्या मदतीने अलाहाबाद मधील मुलांची १९३० साली वानरसेना नावाची संघटना स्थापन केली .निदर्शने,मोर्चे काढणे ,बंधी घातलेल्या वस्तूंची वाहतुक करणे इ.गोष्टी ही सेना करीत असे. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी राष्ट्रीय कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला .१९५५ मध्ये त्या कॉंग्रेस कृती समितीच्या व सेन्ट्रल पार्लमेंट बोर्डाच्या सदस्या झाल्या . फेब्रुवारी १९५९ मध्ये त्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्ष म्हणून निवडून आल्या .१९६४ साली केंद्रीय मंत्रिमंडळात प्रथम रुजू झाल्या. तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मंत्रीमंडळात माहिती व नभोवाणी मंत्री म्हणून त्यांनी त्यावेळी कार्य केले. लाल बह्दूर शास्त्री यांचा ताश्कंद येथे १९६६ मध्ये मृत्यू झाल्यानंतर कॉंग्रेस अध्यक्ष कामराज यांच्या पाठींब्याने १८६ मतांनी मोरारजी देसाई यांचा पराभव करून २४ जानेवारी १९६६ रोजी श्रीमती इंदिरा गांधी भारताच्या पाचव्या प्रधानमंत्री म्हणून विजयी झाल्या. १४ प्रमुख बँकांचे राष्ट्रीयीकरण केले आणि पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेऊन ती यशस्वी केली .
१९३६ मध्ये इंदिरा गांधी यांच्या आई कमला नेहरू यांचे दीर्घ आजाराने देहावसान झाले.यावेळी इंदिरा गांधी अवघ्या १८ वर्षाच्या होत्या.त्यांचे शिक्षण सोमरविले कॉलेज ,ओक्सफोर्ड विद्यापीठ येथे झाले .युरोपातल्या वास्तव्यादरम्यान त्यांची ओळख फिरोजशहा गांधी या तरुणाशी झाली.ही ओळख नंतर प्रेमात बदलून अखेर त्या दोघांनी विवाह केला.फिरोज गांधीसुद्धा राजकारणात सक्रीय होते १९४२ च्या लढ्यात भाग घेतल्याने दोघांना अटक झाली होती. या दांपत्याला राजीव व संजय अशी दोन मुले झाली .पण त्यानंतर दोघात दुरावा येत गेला.दरम्यानच्या काळात फिरोज गांधीना हृदय विकाराचा झटक आल्याने १९६० मध्ये फिरोज गांधीचा मृत्यू झाला.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.