https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

सावरपाडा एक्सप्रेस –कविता राऊत

सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत

     राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कांस्य आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्य व कांस्य अशी पदके  पटकावणारी .लागोपाठच्या या दोन्ही स्पर्धेत भारताचे नाव उंच करणारी धावपटू म्हणजेच सावरपाडा एक्सप्रेस –कविता राऊत .
       गुऑंगजऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत दहा हजार मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक अवघ्या सेकंदाने हुकले; पण त्या प्रसंगी कविताची समजूत तिच्या आईने काढली.आईच्या शब्दाने कविताला दिलासा मिळाला .
    नाशिक जिल्हास्तरीय शालेय  क्रीडास्पर्धेत कविताने धावण्यात प्रथम क्रमांक मिळवला ; पण कविताचे वेगळेपण तिचे वडील रामदास आणि आई सुमित्रा यांना फारशा तीव्रतेने जाणवले नाही . कविताच्या पायात असलेली  चमकदार दौड हेरली ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी .त्यांनी कविताच्या आई वडिलांची मानसिकता तयार करून तिला नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलच्या मैदानावर तंत्रशुद्ध पद्धतीने धावण्याचे धडे देण्यास सुरुवात केली . 
     
     हिऱ्याला  पैलू पडल्यावर त्याचे तेज अधिकच फैलावते ,तसे तिच्या बाबतीत झाले .गुजरातमधील गांधीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील शालेय स्पर्धेत धावण्यामध्ये  रौप्य पदक मिळवून तिने यशाचा प्रारंभ केला. पुढे नाशिक येथे सराव आणि हरसूल येथे शिक्षण अशी कसरत तिला करावी लागत असे .कविताची हि ओढाताण पाहून विजेंद्र सिंग यांनी तिला अकरावी साठी  भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. पण राहण्याचा प्रश्न होताच? २४ ऑक्टोबर २००२ पासून ती प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांच्या घरी त्यांना असलेला एक मुलगा आणि एक मुलगी यांच्या सोबत दुसरी मुलगी म्हणून कविता राहू लागली आणि सिंग दांपत्यांनी पोटच्या मुलीप्रमाणे तिचा सांभाळ केला.प्रशिक्षक विजेंद्र सिंग यांनी तिच्या धावण्याकडे अधिकच लक्ष पुरवले आणि त्याची प्रचीती म्हणजे कविताचे यश .            
       एकापाठोपाठ एक विक्रम तिच्या नावावर झळकू लागले .तिच्या यशामुळे हरसूल  ,सावरपाडा या भागास नवी ओळख मिळाली .नवी दिल्ली तील राष्ट्रकुल स्पर्धेत कविता जिंकल्याचे जाहीर होताच हरसूल ,सावरपाडा येथे राहणाऱ्या लोकांस खूप आनंद झाला .कविताचे कौतुक करण्यासाठी गावोगावचे लोक हजारोच्या संख्येने उपस्थित होते .हे सगळे पाहून तिच्या आई वडिलास खूप आनंद झाला .आपली लेक ‘खूप मोठ्ठी झालीय’ याचे समाधान तिच्या आई वडिलाच्या डोळ्यांमध्ये सहज वाचता येत होते.
       कवितामुळे सावरपाडयाचे नाव आज सर्वदूर पसरले आहे .कविता तिथल्या मुलामुलीसाठी आदर्श ठरली आहे .आज कविता भारतातील अव्वल धावपटू आहे पि.टी .उषा या धावपटूला ती आदर्श मानते .ती खूप मेहनती आहे .धावण्याचा सराव ती मनापासून करते. आपल्या प्रशिक्षकांनी दिलेल्या छोट्या-मोठ्या सुचनांचे  पालन करते .
   
      ‘मेहनत करणे आपल्या हातात आहे .मेहनत हाच ध्येयाकडे नेणारा मार्ग आहे. हाच मार्ग आपलाल्या यशाकडे नेतो .’ असे कविताचे म्हणणे आहे .



No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...