https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

अहिल्या बाई होळकर

अहिल्या बाई होळकर (अहिल्यादेवी होळकर)  

     अहिल्यादेवीचा जन्म मे ३१ इ.स. १७२५ महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेडेगावामध्ये झाला .त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावाचे पाटील होते.त्या काळी स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही  तिच्या वडिलांनी त्यांना लिहिण्या-वाचण्यास शिकवले होते 

     बाजीराव पेशवांचे  सरदार मल्हारराव होळकर हे माळवा प्रांताचे जहागीरदार होते .ते पुण्याला जाताना चौन्डीस थांबले होते .आख्यायिका नुसार आठ वर्षाच्या अहिल्या देवीना मल्हारराव होळकरांनी एका देवळात बघितले .मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वत:चा मुलगा खंडेराव यांची वधु म्हणून आणले ,त्या मराठा साम्राजाच्या माळवा प्रांताचा कारभार बघत होत्या.मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या मुलाच्या मृत्युनंतर मल्हाररावांनी तिला सती जाऊ दिले नाही . .

    अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील महत्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांना पुण्यश्लोक या पदवीने संबोधित करण्यात येते. राणी अहिल्यादेवीनी  अनेक हिंदू मंदिराचे बांधकाम केले. भारतभरात त्यांनी अनेक मंदिरे बांधले ,घाट  बांधले  आणि कित्येक मंदिरांचा जीर्णोद्धार केला .महेश्वर व इंदूर या गावांना सुन्दर बनवले त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले .त्यांत द्वारका ,काशी ,उज्जैन ,नाशिक ,परळी आणि वैजनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.वेरावळ येथील सोमनाथचे गझनीच्या महमदाने उद्ध्वस्त केलेले  देऊळ बघून त्यांना खूप वाईट वाटले आणि त्या मंदिराच्या शेजारीच अहिल्यादेवीने  शंकराचे एक देऊळ बांधले. सोमनाथला जाणारे लोक या देवळालाही  भेट देतात या सर्वांची नोंद भारतीय संस्कृती कोषात आहे.त्यांच्या स्मरणार्थ इंदूर विद्यापीठास त्यांचे नाव दिलेले आहे .

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या काथरीन द ग्रेट ,एलिझाबेथ ,मार्गारेट म्हणून ओळखतात .इ.स १७२५-इ.स .१७९५ या राज्य कालावधीत माळवा प्रांताची होळकर घराण्याची तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखली जाते .अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचे १७५४ मध्ये कुम्हेरच्या लढाईत निधन झाले .१२ वर्ष्यानंतर तिचे सासरे मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले .तिने आपल्या साम्राजाचे तुन्गापासून रक्षण केले.ती लढाईत स्वत: सैनानाचे नेतृत्व केले .तिने तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली.ती न्यायदानासाठी प्रसिद्ध होती .एकदा तर तिने स्वत:च्या मुलास त्याच्या दंड करण्याजोगा अपराधामुळे त्यास हत्तीच्या पायदळी तुडवण्याची शिक्षा केली होती.


    वयाच्या ७० व्या वर्षी अहिल्याबाई होळकरांची प्राणज्योत मावळली .

No comments:

Post a Comment

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...