झाशीची राणी
लक्ष्मीबाई
लक्ष्मीबाई
गंगाधरराव नेवाळकर म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई (१९ नोवेंबर १८३५ ते १७जुने
१८५८) या कालावधीत झाशी राज्याच्या राणी होत्या .हिंदुस्थानात इ.स.१८५७ च्या
ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी विरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी
सेनानी होत्या .यांच्या शौर्याने यांना क्रांतीकारकांची स्फूर्ती देवता म्हणून
जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले
झाशीची राणी लक्ष्मीबाई
यांचा जन्म १९ नोवेंबर १८३५ मध्ये उत्तर प्रदेशातील काशी या ठिकाणी झाला
.लक्ष्मीबाईचे मूळ नाव मणीकर्णिका तांबे असे होते. आई भागीरथीबाई आणि वडील मोरोपंत
तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते तांबे कुटुंब मुळचे सातारचे .
इ.स. १८४२ मध्ये
त्यांचा विवाह झाशी संस्थांचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला .तेंव्हा
त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले .त्यांच्या लग्नानंतर झाशीच्या
प्रजाजनात राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले .
राज्याचे
काम पाहणे गंगाधरराव यांस पसंत नव्हते .तेंव्हा अस्मिता जपण्यासाठी,स्वत्व
जपण्यासाठी त्यांनी रोज व्यायाम ,कसरत,घोडेस्वारी आणि तलवारबाजी यामध्ये मन
गुंतवले .
गंगाधरराव नेवाळकर
आणि लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला ,पण तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला.मुलाच्या
रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधरराव फार दु:खी झाले .त्यांनी
वासुदेव नेवाळकर यांच्या मुलास दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदर असे ठेवले .पुढे इ.स.
१८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले .
धोरणी ,चतुर ,युद्धशास्त्रात
निपुण ,शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या
राणी लक्ष्मीबाई जन्मत: राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित
व्यक्तीमध्ये वावरलेल्या ,वाढलेल्या होत्या .अश्वपरीक्षेचे सर्व माहिती असणाऱ्या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण
हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे ,जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक
अश्वपरीक्षा करणारा नव्हता.अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाईनी युद्ध
शास्त्रातही प्राविण्य मिळवले .बाजीरावांच्या पदरी बाळभट्ट देवधर नावाचे उत्म कसरत पटू आणि कुस्तीगीर
होते .त्यांनीच मल्ल विद्धेत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा
प्रकार शोधून काढला .मनाची
एकाग्रता ,चपलता ,शरीराचा तोल संभाळण्याचे पूर्ण कौशल्य ,काटकपणा आणि बुद्धीचा
विकास करणाऱ्या मल्लखांब विद्धेतही राणी
लक्ष्मी बाई तरबेज झाल्या .
गवर्नर जनरल
डलहौसीने हिन्दुस्थांतील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय घेतला होता .त्यामध्ये
झाशी संस्थानही खालसा करण्यात आले . मार्च १८५४ मध्ये झाशीच्या जनतेला उद्देशून
जाहीरनामा काढण्यात आला .त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झाशी संस्थान ब्रिटीश
सरकारात विलीन करण्यात आले.त्यावेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे
स्फूर्तीदायक उद्गार काढले आणि इ स. १८५७
च्या उठावात इंग्रजाविरुद्ध लढणाऱ्या सैनिकांना ,क्रांतीकारकांना फार मोठी प्रेरणा
झाशीच्या राणीकडून मिळाली .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.