https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

राजमाता जिजाऊ


राजमाता जिजाऊ

         हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजाच्या मातोश्री होत्या .सिंधखेडचे  लखुजी जाधव हे जिजाबाईचे  वडील आणि आई म्हाळसाबाई जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते .
        जिजाऊबाईंचा शहाजी राजांशी दौलताबाद येथे विवाह झाला . जिजाबाईना एकूण आठ अपत्ये होती .त्यापैकी सहा मुली आणि दोन मुलगे होते.त्यांचा थोरला मुलगा संभाजी शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजाची संपूर्ण जबाबदारी जिजामाता वर होती .

         शिवाजी राजे १४ वर्षे असताना त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सोपवली.अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईवर  येऊन पडली.कुशल  अधिकारी समवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले निजामशाही ,आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वाऱ्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी दादाजी कोंडदेव यांच्यासाबोत नेटाने शहराचा कायापालट केला .सोन्याचा नांगर फिरवून  त्यांनी शेत जमीन नांगरली .स्थनिक लोकांना अभय दिले .माजलेल्या रानडुक्करांचा,लांडग्यांचा बंदोबस्त केला .  शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी मोठ्या हिमतीने पेलवली .जिजाबाईनी रामायण महाभारतातील गोष्टी सांगितल्या.सीतेचे हरण करणाऱ्या रावणाचा वध  करणारा राम किती पराक्रमी होता? .बकासुराचा वध  करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता? इ. संस्कारामुळेच  शिवाजी राजे घडले .जिजाबाईनी  नुसत्या गोष्टी सांगितल्या नाहीत तर जवळ बसवून मायेने राजकारणाचे  धडेही  दिले .

         शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईनी त्यांना राजनीतीची  शिकवण दिली .समान ज्ञान देण्याची वृत्ती, अन्याय करणाऱ्या कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस निर्माण केले .शास्त्रात्राच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईने लक्ष ठेवले.शिवराय मोठ्या मोहिमावर असताना खुद्द जिजाबाई राज्यकाराभारावर बारीक लक्ष ठेवत असत.शहाजीराजे बंगळुरात वास्तव्यास असताना आई व वडिलांची चोख जबाबदारी  मोठ्या कौशल्याने पेलली .

          राजांच्या सर्व स्वाऱ्यांचा लढाईचा तपशील त्या ठेवत .त्यांच्याखलबतात  सल्ला-मसलतीत भाग घेत .राजांच्या गैरहजेरीत स्वत:राज्याची धुरा वाहत .शिवाजी राजे  आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्ण  जबाबदारी उतारवयातही  जीजाबाईनी कौशल्यानी निभाऊन नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर १७ जून १६७४ त्यांनी रायगडावर देह ठेवला .


1 comment:

leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...