पंडिता रमाबाई :
स्त्री हक्क आणि समान अधिकार यांच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या .त्यांनी या
क्षेत्रात केलेली भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी
ठरली आहे .स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी
होत्या.रमाबाई रानडेचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी सातारा जिल्ह्यातील एका लहानशा
खेड्यात झाला .वयाच्या ११य़ा वर्षी त्यांचा महादेव गोविंद रानडे यांच्याशी विवाह
झाला .स्त्री शक्षण हे त्या काळात सामाजिक दृष्ट्या वर्ज्य गोष्ट होती .महादेव रानडे
हे सामाजिक चळवळ आणि नवविचार मतवादाचे खंदे पुरस्कर्ते होते .घरच्यांच्या आणि
समाजाच्या विरोधाला झुगारून महादेव रानडे आपला पत्नीस शिक्षित केले.
स्त्रियांना समान अधिकारांसोबत शिक्षणाचा अधिकारही समाजाने नाकारला होता .लग्नानंतर
रमाबाईच्या शिक्षणालाही सुरुवात झाली .रमाबाईनी मराठी,हिंदी आणि बंगाली या भाषेमध्ये
विशेष प्राविण्य संपादन केले .ज्ञानमूर्ती रानडे यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन
रमाबाई स्त्री समाजसुधारणा चळवळीमध्ये सामील झाल्या .त्यांनी आपले आयुष्य समाज
चळवळीसाठी वाहून घेतले स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठीसाठी आणि व्यासपीठ
निर्माण करण्यासाटी हिंदू लेडीज सोशल
क्लब ची मुंबई मध्ये
स्थापना केली .पुण्यातील सेवासदन या संस्थेच्या अध्यक्षपद त्यांनी
भूषवले.पुण्यात मुलीसाठी हुजूरपागा शाळेची स्थापना केली .त्यांनी आपला जीवनपट ‘आमच्या
आयुष्यातील काही आठवणी ‘ या
पुस्तकात शब्दबद्ध करून ठेवला आहे .
इ.स. १९०८ मध्ये
श्री बी.एम.मलबारी आणि श्री दयाराम गिडूमल
हे रमाबाई कडे स्त्रियांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन समाजात रुग्सेविका निर्माण
करण्यासाठी कल्पना घेऊन आले .त्यातूनच मग रमाबाईच्या मार्गदर्शनाखाली सेवासदन मुबईची
स्थापना झाली .इ,स. १९१५ साली सेवासदन पुणे उदयास आली अन मग अनेक शाखामार्फात
संस्था विस्तारत गेली .मुलींचे प्रशिक्षण केंद्रे ,तीन वसतिगृहे असे अनेक उपक्रम
सेवासदन मार्फत राबवले गेले .सेवासदनांचा झपाट्याने झालेला विस्तार आणि प्रसार
रमाबाईच्या ध्यासाचेच द्योतक आहे ,समाजातील रूढ समजुतींच्या विरोधात ठाम भूमिका
घेऊन समाजाचे मत परीवर्तन करून सेवेचे अखंडीत व्रत सुरु ठेवण्यातच रमाबाईच्या
जीवनाची इतिकर्तव्यता होती.
रमाबाईनी स्त्रियांसाठी अनिवार्य प्राथमिक शिक्षणाची
मागणी करण्यासाठी केलेले आंदोलन आणि इ.स. १९२१ -२२ मध्ये मुंबईत प्रांतात स्थापन
केलेली पीडीत मुलींची संघटना या कामगिरीची दखल खुद्द महात्मा गांधीनी घेतली .महात्मा
गांधीनी लिहिलेल्या शोकसंदेशाचा मजकूर- रमाबाई रानडे यांचा मृत्यू ही राष्ट्राची फार मोठी हानी आहे.हिंदू विधवांसाठी
रमाबाई या मोठा आधारस्तंभ होत्या.
भारतीय डाक आणि तार
विभागांने रमाबाई च्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या कार्याच्या गौरावाप्रीत्यर्थ
खास पोष्टाचे तिकीट काढले होते.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.