कल्पना चावला
अंतराळ आणि अंतराळवीर हा विषय निघाल्यावर कल्पना चावला यांची आठवण
निघाल्यावर राहत नाही.अवकाशात
भरारी घेतलेल्या ,आकाशाला आपल्या कवेत घेतलेल्या कल्पना
बद्दल थोडीशी माहिती !
शालेय
शिक्षण गावातील शाळेत झाले .पुढे पंजाब मध्ये १९८२ साली एरोनोटीकाल अभियांत्रिकीची
पदवी मिळवली .१९८४ मध्ये टेक्सास विद्यापीठातून एरोनौटीकल उच्च अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि १९८८ साली कोलोराडो
विद्यापीठातून एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातून डॉक्टरेट मिळवली .
१९८८
मध्ये त्यांनी नासा एम्स रिसर्च सेंटर
मध्ये Vertical /
short takeoff
and landing वर संगणकीय द्रवप्रेरक शक्ती Computational
Fluid Dynamics- CFD
चे
संशोधन केले .१९९३ मध्ये त्या Overset methods vice
president आणि संशोधक म्हणून रुजू झाल्या .
१९९१
मध्ये अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारल्यावर त्यांनी नासा एस्त्रोनौट कॅम्प मध्ये भरती
होण्याचा अर्ज केला होता .त्या मार्च १९९५ मध्ये कोर्पस मध्ये निवडल्या गेल्या व
१९९६ मध्ये त्यांची १५ वा अंतराळात समूहामध्ये उड्डाणासाठी निवड झाली. विना
गुरुत्वाकर्षणाच्या पोकळीत प्रवास करताना
त्या म्हणाल्या होत्या ,You are
just your intelligence .त्यांनी ३७६ तास व ३४ मिनिटात १०६.७
लाख किमी प्रवास केला ,जो पृथ्वीच्या परिघाच्या २५२ पट आहे .
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाशातून
पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला .या स्फोटामुळे कोलंबियाचे
अक्षरश: तुकडे-तुकडे झाले .या यांनामध्ये असलेल्या कल्पना चावला यांचे आणि अन्य अंतराळवीरांचा दुर्दैवी अंत झाला .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.