Third international yog day.I am going to explain importance and rules of yogasanas in Marathi.
योगासने महत्व आणि नियम
शरीराचे अंतरंग व बाह्यांग निरोगी,उत्साही ठेवण्याची क्रिया म्हणजे योगासने .शरीर व मनाचा ऐकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.यापैकी एक जर कमकुवत असेल, तर दुसरे सुदृढ असू शकत नाही.म्हणूनच हजारो वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी,'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते' (A sound mind in a sound body)हे ओळखले होते
दैनंदिन हालचालीमुळे,भोजनामुळे आणि पेयांमुळे शरीरामध्ये जे मलमूत्र व त्याज्य पदार्थ निर्माण होतात , ते पुढीलप्रमाणे विविध मार्गांनी बाहेर पडतात.
१)त्वचेद्वारे २)जननेंद्रियाद्वारे ३)गुदद्वारे ४)मुखाद्वारे ५)कानाद्वारे ६)नेत्राद्वारे ७)नाकाद्वारे
या सात मार्गानी शरीरातील मलमूत्र पुरेशा प्रमाणात व नियमीतपणे उत्सर्जन झाले नाही ,तर नानाप्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. योगासनामुळे मलमूत्र ,त्याज्य पदार्थ वरील मार्गानी नियमितपणे बाहेर पडतात व शरीर निरोगी रहाते.
योगासनाचे महत्त्व
व्यायामाच्या विविध पद्धतीच्या तुलनेत योगासनांची पद्धत अधिक लाभदायक आहे .त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१)व्यायामाच्या इतर पद्धतीमुळे बाह्यअवयवाचे व्यायाम होते.अंतर्गत अवयवाची हालचाल होत नाही.मात्र योगासनांने बाह्य अवयवयांचा आणि अंतर्गत अवयवाचा व्यायाम पुरेशा प्रमाणात होतो.
२)योगासनांसाठी मर्यादित जागेची व कमी साधनांची जरूरी असते
३)इतर व्यायामपद्धतीत अनेकदा जोडीदाराची आवश्यकता भासते ,परंतु योगासनात व्यक्ती एकट्यानेच आसने करू शकते.
४)योगासनात अधिक आहाराची जरुरी भासत नाही,त्यामुळे विशेष खर्चही करावा लागत नाही.
५)योगासनामुळे मलमूत्र आणि शरीरातील त्याज्य पदार्थ व्यवस्थितपणे उतसेर्जित होतात.परिणामी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर व्याधीमुक्त होते
६)योगासनामुळे शरीर लवचिक बनते.त्यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो,काम करण्याची शक्ती वाढते
७)योगासने व प्राणायामामुळे रुधिराभिसरण वाढते व रक्त मोठ्या प्रमाणात शुद्ध होते.
८)पाठीच्या कण्याच्या लवचिकपणावर मनुष्याचे तारुण्य व स्वास्थ्य अवलंबून असते.योगासनामुळे पाठीचा कणा लवचीक ठेऊ शकतो.
९)योगासने करताना शक्तीचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो ; त्यामुळे फारसा थकवा जाणवत नाही,म्हणूनच योगासनाना अहिंसक क्रिया म्हणतात.
१०)योगासनामुळे मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते आणि बुद्धीचा विकास होतो.
११) योगासनाद्वारा शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथी कार्यरत होऊन त्या ग्रंथीमध्ये योग्य प्रमाणात स्त्राव उत्पन्न होऊन शरीराचा संतुलित विकास होतो
१२)योगासने व प्राणयामामुळे बद्दकोष्ठ, वायूविकार,मधुमेह,रक्तदाब ,डोकेदुखी व इतर व्याधी बऱ्या होऊ शकतात .
१३)वृद्ध स्त्री-पुरुष देखील योगासने करू शकतात.ही व्यायाम पद्ध्ती संपूर्ण भारतीय आहे.आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून ही पद्धत स्वीकारली होती.त्यामुळे दीर्घकाळापर्यंत ते निरोगी व स्वस्थ जीवन जगू शकत होते.
१४) योगासनामुळे हृदय ,फुफ्फुसे व मज्जारज्जू सशक्त बनतात व त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
१५)योगासनामुळे मानसिक समाधान आणि शांतता मिळते.
१६)वेगवेगळ्या योगासनाद्वारे शरीरातील वेगवेगळ्या केशवाहिन्यातील रक्त शुद्ध करता येते.
१७) नियमितपणे योगासने करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोणतीही अशुद्धता राहत नाही.
योगासनांची काही नियम:-
१) योगासने सकाळी प्रातर्विधीनंतर करावीत.जर स्नानानंतर योगासने करता आली तर उत्तम;कारण स्नानानंतर शरीर हलके व प्रसन्न बनते.
२) योगासनांनंतर अंघोळ करायची असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी.
३)योगासने करण्याची जागा स्वच्छ ,सपाट,हवेशीर, प्रकाशयुक्त आणि शांत असायला हवी.अशा जागी सतरंजी अंथरून त्यावर योगासने करावीत.
४)योगासने करताना पुरुषासाठी लंगोट,जंगीया किंवा हाफपॅन्ट आणि स्त्रियांसाठी पंजाबी ड्रेस किंवा स्लॅकस हा अधिक अनूकुल असा पोशाख आहे.
५) योगासने करताना बोलू नये .एकाग्रतेने योगासने करावीत.श्वासावर तसेच शरिराच्या ज्या भागावर दाब पडत असेल त्या भागावरच लक्ष केंद्रित करावे.
६)योगासन ही अहिंसक क्रिया असल्याने ,तेंव्हा शरीराला हिसके देऊन आसने करू नयेत.
७)योगासनांचा सराव हळूहळू वाढवला पाहिजे.असे केल्याने शरीर लवचिक बनते व थोड्या अवधीतच आसनांची पूर्ण स्थिती प्राप्त करू शकते.
८)योगासने करताना नियमितपणा असायला हवा .नाहींतर अनियमिततेमुळे हानी होऊ शकते.
९)योगासन ही विज्ञानाधारीत प्रक्रिया आहे.तिचा संबंध आंतर-बाह्य भागांशी आहे.म्हणून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावीत
१०)शक्यतो हलका आहार घ्यावा,जेणेकरून शरीर हलके राहील
११)आजारी असल्यास ,ताप आला असेल, खूप थकवा आला असेल तर आसने करू नयेत .
१२)योगासनांची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ हा वाढवला पाहिजे
१३) पहिल्याच दिवशी जास्त आसने करण्याचा मोह धरू नये.
१४)कोणत्याही योगासनांच्या प्रारंभिक स्तिथीतून अंतिम स्थितीत अंतिम स्थितीतून प्रारंभिक स्थितीत येताना घाई-गडबड करू नये.
१५)योगासने करताना मन शांत असणे आवश्यक आहे.
१६)योगासने केल्यानंतर थकवा वाटला नाही,शरीर हलके वाटले आणि काम करण्याचा जोम वाढला,तर असे समजावे की योगासने चांगल्या प्रकारे करता येतात.
१७)योगसने केल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे,त्यामुळे थकवा नाहीसा होऊन शक्ती संचय होतो
१८)योगासन करताना यौगिक क्रिया ठराविक क्रमाने करणे आवश्यक आहे.या क्रमाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
योगासने महत्व आणि नियम
शरीराचे अंतरंग व बाह्यांग निरोगी,उत्साही ठेवण्याची क्रिया म्हणजे योगासने .शरीर व मनाचा ऐकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.यापैकी एक जर कमकुवत असेल, तर दुसरे सुदृढ असू शकत नाही.म्हणूनच हजारो वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी,'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते' (A sound mind in a sound body)हे ओळखले होते
दैनंदिन हालचालीमुळे,भोजनामुळे आणि पेयांमुळे शरीरामध्ये जे मलमूत्र व त्याज्य पदार्थ निर्माण होतात , ते पुढीलप्रमाणे विविध मार्गांनी बाहेर पडतात.
१)त्वचेद्वारे २)जननेंद्रियाद्वारे ३)गुदद्वारे ४)मुखाद्वारे ५)कानाद्वारे ६)नेत्राद्वारे ७)नाकाद्वारे
या सात मार्गानी शरीरातील मलमूत्र पुरेशा प्रमाणात व नियमीतपणे उत्सर्जन झाले नाही ,तर नानाप्रकारचे रोग होण्याची शक्यता असते. योगासनामुळे मलमूत्र ,त्याज्य पदार्थ वरील मार्गानी नियमितपणे बाहेर पडतात व शरीर निरोगी रहाते.
योगासनाचे महत्त्व
व्यायामाच्या विविध पद्धतीच्या तुलनेत योगासनांची पद्धत अधिक लाभदायक आहे .त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१)व्यायामाच्या इतर पद्धतीमुळे बाह्यअवयवाचे व्यायाम होते.अंतर्गत अवयवाची हालचाल होत नाही.मात्र योगासनांने बाह्य अवयवयांचा आणि अंतर्गत अवयवाचा व्यायाम पुरेशा प्रमाणात होतो.
२)योगासनांसाठी मर्यादित जागेची व कमी साधनांची जरूरी असते
३)इतर व्यायामपद्धतीत अनेकदा जोडीदाराची आवश्यकता भासते ,परंतु योगासनात व्यक्ती एकट्यानेच आसने करू शकते.
४)योगासनात अधिक आहाराची जरुरी भासत नाही,त्यामुळे विशेष खर्चही करावा लागत नाही.
५)योगासनामुळे मलमूत्र आणि शरीरातील त्याज्य पदार्थ व्यवस्थितपणे उतसेर्जित होतात.परिणामी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर व्याधीमुक्त होते
६)योगासनामुळे शरीर लवचिक बनते.त्यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो,काम करण्याची शक्ती वाढते
७)योगासने व प्राणायामामुळे रुधिराभिसरण वाढते व रक्त मोठ्या प्रमाणात शुद्ध होते.
८)पाठीच्या कण्याच्या लवचिकपणावर मनुष्याचे तारुण्य व स्वास्थ्य अवलंबून असते.योगासनामुळे पाठीचा कणा लवचीक ठेऊ शकतो.
९)योगासने करताना शक्तीचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो ; त्यामुळे फारसा थकवा जाणवत नाही,म्हणूनच योगासनाना अहिंसक क्रिया म्हणतात.
१०)योगासनामुळे मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते आणि बुद्धीचा विकास होतो.
११) योगासनाद्वारा शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथी कार्यरत होऊन त्या ग्रंथीमध्ये योग्य प्रमाणात स्त्राव उत्पन्न होऊन शरीराचा संतुलित विकास होतो
१२)योगासने व प्राणयामामुळे बद्दकोष्ठ, वायूविकार,मधुमेह,रक्तदाब ,डोकेदुखी व इतर व्याधी बऱ्या होऊ शकतात .
१३)वृद्ध स्त्री-पुरुष देखील योगासने करू शकतात.ही व्यायाम पद्ध्ती संपूर्ण भारतीय आहे.आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून ही पद्धत स्वीकारली होती.त्यामुळे दीर्घकाळापर्यंत ते निरोगी व स्वस्थ जीवन जगू शकत होते.
१४) योगासनामुळे हृदय ,फुफ्फुसे व मज्जारज्जू सशक्त बनतात व त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
१५)योगासनामुळे मानसिक समाधान आणि शांतता मिळते.
१६)वेगवेगळ्या योगासनाद्वारे शरीरातील वेगवेगळ्या केशवाहिन्यातील रक्त शुद्ध करता येते.
१७) नियमितपणे योगासने करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोणतीही अशुद्धता राहत नाही.
योगासनांची काही नियम:-
१) योगासने सकाळी प्रातर्विधीनंतर करावीत.जर स्नानानंतर योगासने करता आली तर उत्तम;कारण स्नानानंतर शरीर हलके व प्रसन्न बनते.
२) योगासनांनंतर अंघोळ करायची असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी.
३)योगासने करण्याची जागा स्वच्छ ,सपाट,हवेशीर, प्रकाशयुक्त आणि शांत असायला हवी.अशा जागी सतरंजी अंथरून त्यावर योगासने करावीत.
४)योगासने करताना पुरुषासाठी लंगोट,जंगीया किंवा हाफपॅन्ट आणि स्त्रियांसाठी पंजाबी ड्रेस किंवा स्लॅकस हा अधिक अनूकुल असा पोशाख आहे.
५) योगासने करताना बोलू नये .एकाग्रतेने योगासने करावीत.श्वासावर तसेच शरिराच्या ज्या भागावर दाब पडत असेल त्या भागावरच लक्ष केंद्रित करावे.
६)योगासन ही अहिंसक क्रिया असल्याने ,तेंव्हा शरीराला हिसके देऊन आसने करू नयेत.
७)योगासनांचा सराव हळूहळू वाढवला पाहिजे.असे केल्याने शरीर लवचिक बनते व थोड्या अवधीतच आसनांची पूर्ण स्थिती प्राप्त करू शकते.
८)योगासने करताना नियमितपणा असायला हवा .नाहींतर अनियमिततेमुळे हानी होऊ शकते.
९)योगासन ही विज्ञानाधारीत प्रक्रिया आहे.तिचा संबंध आंतर-बाह्य भागांशी आहे.म्हणून तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावीत
१०)शक्यतो हलका आहार घ्यावा,जेणेकरून शरीर हलके राहील
११)आजारी असल्यास ,ताप आला असेल, खूप थकवा आला असेल तर आसने करू नयेत .
१२)योगासनांची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ हा वाढवला पाहिजे
१३) पहिल्याच दिवशी जास्त आसने करण्याचा मोह धरू नये.
१४)कोणत्याही योगासनांच्या प्रारंभिक स्तिथीतून अंतिम स्थितीत अंतिम स्थितीतून प्रारंभिक स्थितीत येताना घाई-गडबड करू नये.
१५)योगासने करताना मन शांत असणे आवश्यक आहे.
१६)योगासने केल्यानंतर थकवा वाटला नाही,शरीर हलके वाटले आणि काम करण्याचा जोम वाढला,तर असे समजावे की योगासने चांगल्या प्रकारे करता येतात.
१७)योगसने केल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे,त्यामुळे थकवा नाहीसा होऊन शक्ती संचय होतो
१८)योगासन करताना यौगिक क्रिया ठराविक क्रमाने करणे आवश्यक आहे.या क्रमाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.