Fruit Amla information in marathi
आवळा-
आवळा आहारशास्त्रात मानाचे स्थान आहे ,अनेक औषधामध्ये याचा समावेश होतो .अमृताचे गुण देणारे कल्पवृक्षीय फळाला सुश्रुतने अग्रक्रम दिलेला आहे.आवळ्याचे बोटॅनिकल नाव Emblica Officinalis किंवा Phyllantus Emblica असे आहे.
आयुर्वेदिक शेतामध्ये आवळा हे प्रमुख उत्पादन आहे.आवळ्याचे झाड साधरपणे पंधरा ते वीस फुटाचे असते.पाने छोटी पण हिरवीगार असतात.आवळ्याचे आकारावरून विविध जाती असतात मोठ्या सुपारीएवढे फळ असते.
साधरपणे ऑक्टोबर -डिसेंबरमध्ये ही फळे चाखायला मिळतात .
हे झाड परसबागेत ,जंगलात,मोकळ्या जागेत येतात.गुजरात,बनारस,हरिद्वारमध्ये आवळ्याचे पीक भरपूरयेते.
या फळामध्ये लोह,फॉस्फरस,फॅट,फायबर,कॅल्शियम,कार्बोहायड्रेट,बी जीवनसत्व ,सी जीवनसत्व हे तत्व आढळतात.
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे-
१)उत्साह व शक्तिवर्धक गुणामुळे हृदयरोग्यांना आवळा वरदान आहे.
२)नियमित सेवनाने त्वचा कांतिमान होते.अनेक त्वचारोगावर आवळा रामबाण औषध आहे आणि वार्धक्य विलंबाने येते.
३)केसांसाठी आवळा जास्त फायद्याचे आहे.केसगळती थांबते,केस लांब होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चमकदार व काळेभोर होतात.केसांसाठी आवळा उत्तम कंडिशनर आहे.
४)यकृताच्या अनेक तक्रारीवर उपयोग होतो
५)स्कर्वी रोगावर मात करण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो.
६)डोळ्यांसाठीही आवळा हितकारक असल्याने मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यावरील परिणामांना आवर घालता येतो.
७)मधुमेही रुग्णांनी नियमित सेवन केल्यास साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते.
८)आवळा कोणत्याही रूपात खाल्ला तरी चालतो, आवळ्यात सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
९)आवळ्यात सी जीवनसत्व असल्याने बऱ्याच औषधात त्याचा उपयोग करतात
१०)या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हितावह आहे.
आंबट,तुरट ,कडवट ,अशा चवीनी युक्त असणारा आवळा शरीरात जोम व उत्साह निर्माण करतो.आवळा ताजा न मिळाल्यास त्याची पावडर उपयोगात आणावी.त्रिफळा चूर्ण , च्यवनप्राश या लोकप्रिय औषधामध्ये आवळा वापरला जातो.मातेच्या ठिकाणी जसे ममत्वाचे व उपकारक गुण असतात तसेच आवळ्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला धात्रीफळ असेही म्हणतात
कच्या आवळ्याचे सरबत-
कच्या आवळ्याचा रस काढून घ्यावा. रसाच्या मापाच्या चौपट साखर घ्यावी.साखरेचा २ तारी पाक करावा.पाक थंड झाल्यावर रस मिसळून एक उकळी आणावी व थंड करून स्वच्छ बतल्यात भरून ठेवावे.
हे सरबत अतिशय उत्साहवर्धक आहे.त्यामुळे खूप कामाने, अभ्यासाने,प्रवासाने आलेला थकवा दूर होतो.बाजारातील हानिकारक शीतपेय पिण्यापेक्षा आवळा सरबत पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे.आवळा सरबत अभ्यासू मुलांना रोज पिण्यास द्यावे.
आवळा-
आवळा आहारशास्त्रात मानाचे स्थान आहे ,अनेक औषधामध्ये याचा समावेश होतो .अमृताचे गुण देणारे कल्पवृक्षीय फळाला सुश्रुतने अग्रक्रम दिलेला आहे.आवळ्याचे बोटॅनिकल नाव Emblica Officinalis किंवा Phyllantus Emblica असे आहे.
आयुर्वेदिक शेतामध्ये आवळा हे प्रमुख उत्पादन आहे.आवळ्याचे झाड साधरपणे पंधरा ते वीस फुटाचे असते.पाने छोटी पण हिरवीगार असतात.आवळ्याचे आकारावरून विविध जाती असतात मोठ्या सुपारीएवढे फळ असते.
साधरपणे ऑक्टोबर -डिसेंबरमध्ये ही फळे चाखायला मिळतात .
हे झाड परसबागेत ,जंगलात,मोकळ्या जागेत येतात.गुजरात,बनारस,हरिद्वारमध्ये आवळ्याचे पीक भरपूरयेते.
या फळामध्ये लोह,फॉस्फरस,फॅट,फायबर,कॅल्शियम,कार्बोहायड्रेट,बी जीवनसत्व ,सी जीवनसत्व हे तत्व आढळतात.
या फळाच्या सेवनाने होणारे फायदे-
१)उत्साह व शक्तिवर्धक गुणामुळे हृदयरोग्यांना आवळा वरदान आहे.
२)नियमित सेवनाने त्वचा कांतिमान होते.अनेक त्वचारोगावर आवळा रामबाण औषध आहे आणि वार्धक्य विलंबाने येते.
३)केसांसाठी आवळा जास्त फायद्याचे आहे.केसगळती थांबते,केस लांब होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चमकदार व काळेभोर होतात.केसांसाठी आवळा उत्तम कंडिशनर आहे.
४)यकृताच्या अनेक तक्रारीवर उपयोग होतो
५)स्कर्वी रोगावर मात करण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो.
६)डोळ्यांसाठीही आवळा हितकारक असल्याने मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यावरील परिणामांना आवर घालता येतो.
७)मधुमेही रुग्णांनी नियमित सेवन केल्यास साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते.
८)आवळा कोणत्याही रूपात खाल्ला तरी चालतो, आवळ्यात सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
९)आवळ्यात सी जीवनसत्व असल्याने बऱ्याच औषधात त्याचा उपयोग करतात
१०)या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हितावह आहे.
आंबट,तुरट ,कडवट ,अशा चवीनी युक्त असणारा आवळा शरीरात जोम व उत्साह निर्माण करतो.आवळा ताजा न मिळाल्यास त्याची पावडर उपयोगात आणावी.त्रिफळा चूर्ण , च्यवनप्राश या लोकप्रिय औषधामध्ये आवळा वापरला जातो.मातेच्या ठिकाणी जसे ममत्वाचे व उपकारक गुण असतात तसेच आवळ्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला धात्रीफळ असेही म्हणतात
कच्या आवळ्याचे सरबत-
कच्या आवळ्याचा रस काढून घ्यावा. रसाच्या मापाच्या चौपट साखर घ्यावी.साखरेचा २ तारी पाक करावा.पाक थंड झाल्यावर रस मिसळून एक उकळी आणावी व थंड करून स्वच्छ बतल्यात भरून ठेवावे.
हे सरबत अतिशय उत्साहवर्धक आहे.त्यामुळे खूप कामाने, अभ्यासाने,प्रवासाने आलेला थकवा दूर होतो.बाजारातील हानिकारक शीतपेय पिण्यापेक्षा आवळा सरबत पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे.आवळा सरबत अभ्यासू मुलांना रोज पिण्यास द्यावे.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.