तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त
भारतात फार प्राचीन काळापासून योगाभ्यास करण्याची परंपरा चालत आलेली आहे.हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लोकांच्या कल्याणासाठी योगाभ्यासाची रचना केली होती.योगाचे स्वरूप अत्यंत व्यापक असून कोणत्याही एका व्याख्येत बद्ध केले जाऊ शकत नाही
योग हा शब्द संस्कृत असून ,तो' युज्' या धातूपासून बनला आहे.याचा अर्थ एकत्र करणे वा जोडणे असा आहे.योगामुळे आत्मा व परमात्माचे एकीकरण होय.योग हे एक कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश ठेवणे व सत्याची प्राप्ती यांचे साधन मानण्यात आले आहे.शरीराचे व मनाचे स्वास्थ्य टिकवणारी ही भारतीय व्यायांम पद्धत मधल्या काळात दुर्लक्षित झाली होती.परंतु आता लोकाना या पद्धतीचे महत्व पटले असून विविध व्याधीच्या निवारणासाठी,रोगाच्या निवारणासाठी आज जगभर योगासनांचा वापर केला जात आहे.
योगसूत्रात महर्षी पतंजली यांनी शरीर व मनाच्या शुद्धीकरिता योगाची आठ अंगे सांगितली आहेत.त्यास अष्टांग योग असे संबोधले जाते. ही आठ अंगे खालील प्रमाणे--१)यम २)नियम ३)आसन ४) प्राणायाम ५)प्रत्याहार ६)धारणा ७) ध्यान ८)समाधी अशी आहेत.
या अंगाचे थोडक्यात विवेचन पुढीलप्रमाणे:-
१) यम:-यम म्हणजे निग्रह ,निग्रह म्हणजे काही विशेष प्रकारची कामे न करणे. यमाचे प्रकार पाच आहेत.
अहिंसा, सत्य ,अस्तेय,ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह
कोणत्याही प्राण्यास त्रास न देणे -अहिंसा
कानांनी जे ऐकले,डोळ्यांनी जे पाहिले तेच प्रस्तुत करणे -सत्य
चोरी न करणे,दुसऱ्याच्या धनाचा लोभ न ठेवणे- अस्तेय
सर्व इंद्रियासह विषय-विकारावर संयम ठेवणे -ब्रम्हचर्य
भोगलालसा ठेऊन योग होऊ शकत नाही, विलासी व संग्राहक वृत्तीचा त्याग -अपरिग्रह
२)नियम:- नियमाचे प्रकार पाच आहेत.
शौच, संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वराचे ध्यान
शौच:-शरीर व मनाचे पावित्र्य हा आहे
संतोष:-अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाने प्रसन्न राहणे.संतोष हे सर्वश्रेष्ठ अशा सुखाचे नाव आहे.
तप:-सुखदुःखाचे प्रसंग सहन करणे
स्वाध्याय:-विचारांची शुद्धी आणि ज्ञान प्राप्तीसाठी विचाराचे केले जाणारे आदानप्रदान
ईश्वराचे ध्यान:- मन , वाचा,कृती यांनी ईश्वराची भक्ती करणे
३)आसन:-योगाची ही तिसरी पायरी.योगाचे एक महत्त्वपूर्ण अंग.महर्षी पतंजलीने योगसूत्रात आसनास स्थिरसुखमासनम् असे म्हटले आहे. याचा अर्थ -शरीराची अशी स्थिती की,ज्यात शरीर स्थिर राहावे आणि मनाला सुखाची अनुभूती यावी,ते आसन होय.आसन केल्याने शरीरशुद्धी,नाडीशुद्धी, स्वास्थ्यवृद्धी होऊन तनमनाला स्फूर्ती प्राप्त होते.अशा प्रकारे नियमित आसने केल्यास शरीर योगाभ्यासाठी शक्तीशाली बनते.
४)प्राणायाम:-योगामध्ये प्रणायामाला महत्वपूर्ण स्थान आहे.प्राणायामाचा उद्देश शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरीत, संचरित,नियमित व संतुलित करणे हा होय.ज्या प्रकारे शरीर निरोगी, स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी स्नानाची आवश्यकता असते;त्याचप्रमाणे मन स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता असते.
५)प्रत्याहार:-ज्या अवस्थेमध्ये इंद्रिये बाह्य व विषयापासून मुक्त होऊन अंतर्मुख बनतात, त्या अवस्थेला प्रत्याहार म्हणतात. यामुळे साधकाचे चंचल मन व स्वेच्छाचारी इंद्रिये शांत व स्थिर होतात.
६)धारणा:-मन एकाग्र करणे म्हणजे धारणा होय.धारणेद्वारा शांत चित्तवृत्ती कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित करता येते.
७)ध्यान:- ध्यानाच्या सरावाने खरे खोटे ,चांगले-वाईट परखण्याचा विवेक जागृत होतो.सर्वत्र तटस्थ भावनेने पाहण्याची शक्ती निर्माण होते.
८)समाधी:-साधकाला फक्त ध्येयाच्या स्वरूपाचीच जाणीव राहते,तेंव्हा साधक ध्यान अवस्थेतुन समाधी अवस्थेत प्रवेश करतो.ध्यानाची परिसीमा म्हणजे समाधी होय.सांसारिक प्रलोभनामुळे चित्ताची एकाग्रता विचलित होत असते,या पासून दूर राहण्यासाठी चित्ताची एकाग्रता वाढवली पाहिजे.
योगाची पहिली पाच अंगे-यम, नियम ,आसन,प्राणायाम व प्रत्याहार याना बाह्यांग योग म्हणतात; तर ध्यान ,धारणा,समाधी याना अंतर्गत योग किंवा संयम म्हणतात.
या अष्टांग योगाचा जीवनात उलयोग केला तर माणसात सदाचार व सतचरित्र या गुणांचा विकास होतो.याचबरोबर माणसाची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती होते व त्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ्य मिळते.
भारतात फार प्राचीन काळापासून योगाभ्यास करण्याची परंपरा चालत आलेली आहे.हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लोकांच्या कल्याणासाठी योगाभ्यासाची रचना केली होती.योगाचे स्वरूप अत्यंत व्यापक असून कोणत्याही एका व्याख्येत बद्ध केले जाऊ शकत नाही
योग हा शब्द संस्कृत असून ,तो' युज्' या धातूपासून बनला आहे.याचा अर्थ एकत्र करणे वा जोडणे असा आहे.योगामुळे आत्मा व परमात्माचे एकीकरण होय.योग हे एक कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश ठेवणे व सत्याची प्राप्ती यांचे साधन मानण्यात आले आहे.शरीराचे व मनाचे स्वास्थ्य टिकवणारी ही भारतीय व्यायांम पद्धत मधल्या काळात दुर्लक्षित झाली होती.परंतु आता लोकाना या पद्धतीचे महत्व पटले असून विविध व्याधीच्या निवारणासाठी,रोगाच्या निवारणासाठी आज जगभर योगासनांचा वापर केला जात आहे.
योगसूत्रात महर्षी पतंजली यांनी शरीर व मनाच्या शुद्धीकरिता योगाची आठ अंगे सांगितली आहेत.त्यास अष्टांग योग असे संबोधले जाते. ही आठ अंगे खालील प्रमाणे--१)यम २)नियम ३)आसन ४) प्राणायाम ५)प्रत्याहार ६)धारणा ७) ध्यान ८)समाधी अशी आहेत.
या अंगाचे थोडक्यात विवेचन पुढीलप्रमाणे:-
१) यम:-यम म्हणजे निग्रह ,निग्रह म्हणजे काही विशेष प्रकारची कामे न करणे. यमाचे प्रकार पाच आहेत.
अहिंसा, सत्य ,अस्तेय,ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह
कोणत्याही प्राण्यास त्रास न देणे -अहिंसा
कानांनी जे ऐकले,डोळ्यांनी जे पाहिले तेच प्रस्तुत करणे -सत्य
चोरी न करणे,दुसऱ्याच्या धनाचा लोभ न ठेवणे- अस्तेय
सर्व इंद्रियासह विषय-विकारावर संयम ठेवणे -ब्रम्हचर्य
भोगलालसा ठेऊन योग होऊ शकत नाही, विलासी व संग्राहक वृत्तीचा त्याग -अपरिग्रह
२)नियम:- नियमाचे प्रकार पाच आहेत.
शौच, संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वराचे ध्यान
शौच:-शरीर व मनाचे पावित्र्य हा आहे
संतोष:-अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाने प्रसन्न राहणे.संतोष हे सर्वश्रेष्ठ अशा सुखाचे नाव आहे.
तप:-सुखदुःखाचे प्रसंग सहन करणे
स्वाध्याय:-विचारांची शुद्धी आणि ज्ञान प्राप्तीसाठी विचाराचे केले जाणारे आदानप्रदान
ईश्वराचे ध्यान:- मन , वाचा,कृती यांनी ईश्वराची भक्ती करणे
३)आसन:-योगाची ही तिसरी पायरी.योगाचे एक महत्त्वपूर्ण अंग.महर्षी पतंजलीने योगसूत्रात आसनास स्थिरसुखमासनम् असे म्हटले आहे. याचा अर्थ -शरीराची अशी स्थिती की,ज्यात शरीर स्थिर राहावे आणि मनाला सुखाची अनुभूती यावी,ते आसन होय.आसन केल्याने शरीरशुद्धी,नाडीशुद्धी, स्वास्थ्यवृद्धी होऊन तनमनाला स्फूर्ती प्राप्त होते.अशा प्रकारे नियमित आसने केल्यास शरीर योगाभ्यासाठी शक्तीशाली बनते.
४)प्राणायाम:-योगामध्ये प्रणायामाला महत्वपूर्ण स्थान आहे.प्राणायामाचा उद्देश शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरीत, संचरित,नियमित व संतुलित करणे हा होय.ज्या प्रकारे शरीर निरोगी, स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी स्नानाची आवश्यकता असते;त्याचप्रमाणे मन स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता असते.
५)प्रत्याहार:-ज्या अवस्थेमध्ये इंद्रिये बाह्य व विषयापासून मुक्त होऊन अंतर्मुख बनतात, त्या अवस्थेला प्रत्याहार म्हणतात. यामुळे साधकाचे चंचल मन व स्वेच्छाचारी इंद्रिये शांत व स्थिर होतात.
६)धारणा:-मन एकाग्र करणे म्हणजे धारणा होय.धारणेद्वारा शांत चित्तवृत्ती कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित करता येते.
७)ध्यान:- ध्यानाच्या सरावाने खरे खोटे ,चांगले-वाईट परखण्याचा विवेक जागृत होतो.सर्वत्र तटस्थ भावनेने पाहण्याची शक्ती निर्माण होते.
८)समाधी:-साधकाला फक्त ध्येयाच्या स्वरूपाचीच जाणीव राहते,तेंव्हा साधक ध्यान अवस्थेतुन समाधी अवस्थेत प्रवेश करतो.ध्यानाची परिसीमा म्हणजे समाधी होय.सांसारिक प्रलोभनामुळे चित्ताची एकाग्रता विचलित होत असते,या पासून दूर राहण्यासाठी चित्ताची एकाग्रता वाढवली पाहिजे.
योगाची पहिली पाच अंगे-यम, नियम ,आसन,प्राणायाम व प्रत्याहार याना बाह्यांग योग म्हणतात; तर ध्यान ,धारणा,समाधी याना अंतर्गत योग किंवा संयम म्हणतात.
या अष्टांग योगाचा जीवनात उलयोग केला तर माणसात सदाचार व सतचरित्र या गुणांचा विकास होतो.याचबरोबर माणसाची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती होते व त्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ्य मिळते.
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.