https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Thursday, 29 June 2017

3) जल नेती व सुत्र नेती | Body cleansing process at home (Neti)

I am trying to explain body cleansing process at home using Neti in yoga.You can read more information about it

   नेती  (neti)

योगासने किंवा प्राणायाम करण्यापूर्वी शरीर शुद्ध होणे, विषमुक्त होणे आवश्यक आहे.अनेक करणामुळे शरीरात अशुद्धी साचत असते, या अशुद्धीकडे दुर्लक्ष केले तर योगासनापासून किंवा प्राणायामपासून फारसा लाभ होणार नाही.नेतीमुळे नासिकामार्गाची स्वछता होते.
योगशास्त्रांनी सहा प्रकारच्या शुद्धीक्रिया सांगितलेल्या आहेत.त्यापैकी नेती या शुद्धीक्रीयेची माहिती पाहुयात.....

नेती:--नेतीचे मुख्यतः दोन व प्रकार आहेत.
          १)जलनेती व २) सूत्रनेती
   
१)जलनेती:-

 जलनेतीसाठी  विशिष्ठ प्रकारच्या चंबूचा वापर करावा लागतो.ऑनलाईन तसा  चंबू मागवता येतो.त्या चंबूस नेती चंबू म्हणतात.

जलनेती करण्याची कृती:-

१)प्रथम एक तांब्याभर शुद्ध पाण्यात अर्धा चमचा मीठ टाकून पाणी उकळून घ्या.कोमट झालेले पाणी नेती चंबूत भरा.
२)बाथरूममध्ये किंवा बेसिनसमोर उभे राहून ,थोडे पुढे वाकून डोके डाव्या बाजूला झुकवून उजव्या नाकपुडीत चंबूची तोटी घालावी,म्हणजे उजव्या नाकपुडीत शिरलेले पाणी डाव्या नाकपुडीतून बाहेर येऊ लागेल.

Body cleansing process at home using Neti in yoga


३)ही क्रिया एखादा मिनिट चालू ठेवावी;नंतर चंबूची तोटी उजव्या नाकपुडीतून बाहेर काढावी
४)आता डोके उजव्या झुकवून,चंबूची तोटी डाव्या नाकपुडीत वरीलप्रमाणे घाला.म्हणजे उजव्या नाकपुडीतून पाणी बाहेर येऊ लागेल.ही क्रियाही एखाद्या मिनिटभर चालू ठेवावी

नेतीमुळे होणारे फायदे:-

१)नाक व डोळे स्वच्छ राहतात
२)सर्दी ,डोकेदुखी,अर्धशिशी आणि सायनसचा त्रास यावर जलनेती रामबाण उपाय आहे.
३)जलनेती केल्यानंतर प्राणायाम चांगल्याप्रकारे करता येते
४) नाकातील चामखीळ नाहीशी होते.

   सावधानता :-

१)नाकपुडीत शिरलेले पाणी तोंडात आले ,तर थुंकून टाकावे.
२)जलनेती करताना एक-दोनवेळा नाकाची आग होईल,शिंका येतील आणि डोळ्यात पाणी येईल. असे होणे स्वाभाविक आहे.परंतु दोन चार दिवसात सवय होईल
३) ज्या व्यक्तीचा नाकाचा घोळणा फुटण्याची तक्रार असेल,त्या व्यक्तींनी तज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा.


  २) सूत्रनेती
 
सूत्र म्हणजे धागा.या प्रयोगात एक सुती धागा मेणानी कडक बनवून एका नाकपुडीतून आत सारून धाग्याचे टोक घशातून तोंडात काढावे.धाग्याचे एक टोक नाकपुडीत आणि दुसरे टोक घशातून तोंडात पकडावे .आजकाल धाग्याऐवजी रबराच्या पातळ नळ्या मेडिकल स्टोअर्स मध्ये मिळू शकतात .नाकपुडीतले व तोंडातले नळीचे टोके धरून नळी मागे पुढे करावी. ही क्रिया ३०ते५० वेळा करावी.
Body cleansing process at home using Neti in yoga

आता नळी बाहेर काढून दुसऱ्या नाकपुडीतून हिच क्रिया पुन्हा३० ते ५० वेळा  करावी.

  सुत्रनेतीमुळे होणारे फायदे:-

१)जलनेतीद्वारे होणारे फायदे सुत्रनेतीमुळेही होतात
२)नाकावाटे श्वसनक्रिया बंद असणाऱ्या व्यक्तीलाही सुत्रनेतीपासून फायदा होतो
३)श्वासनलिकेद्वारा होणारा अतिस्त्राव ,सामान्य स्वरूपाची सूज दूर होऊन श्वासनलिकेचा बंद मार्ग मोकळा होतो

सावधानता:-
१) रबराची नळी नाकाच्या छिद्रातून हळूहळू सरकवावी.
२) तज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा

____;_____________________________________

Tuesday, 27 June 2017

How to identify overweight or obese

Here I am trying to explain about overweight or obese and also explaining which problems created due to overweight.

लठ्ठपणा कसा ओळखाल?

सर्वप्रथम आपण पाहूया लठ्ठपणा कसा वाढतो?

व्यायामाचा अभाव, योगासनांचा अभाव,चुकीच्या खाण्याच्या सवयी,क्रीडांगणापासून दूर राहणे,सातत्याने टीव्ही समोर कार्टून अथवा गेम खेळण्यात मग्न असणे आणि हे करत असताना हातात काहीतरी खायला असणे, बैठे काम ,आनुवंशिक ,अधिक उष्मांकचा आहार, मानसिक तणाव, थायरॉइड , हार्मोन्सची कमतरता व त्यामुळे होणारे हार्मोन्सचे असंतुलन अशा कारणामुळे हल्ली लठ्ठपणा वाढताना दिसतो.

लठ्ठपणाचे लक्षणे:-

चालताना धाप लागणे,दम लागणे.
श्वासाची गती वाढणे,थकणे, वारंवार भूक लागणे,चिडचिड होणे,कंटाळा येणे ही लक्षणे दिसू लागतात
मुलामध्ये आलेला हा जाडेपणा आहे का लठ्ठपणा आहे हे ओळखता आले पाहिजे.मुले काय खातात,व्यायाम किती करतात,किती चालतात,धावतात याकडे लक्ष दिले पाहिजे ,नाही तर ही मूले मोठी झाली की त्यांच्यात आळशीपणा वाढीस लागतो आणि बघता बघता पोटाचा घेर सुटायला लागतो.
वाढलेल्या लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात.लठ्ठपणामुळे जेवढे वजन वाढते त्याचा बोजा शरीराच्या विविध अवयवावर पडून ते अवयव निकामी होऊ शकतात. मुलासह मोठ्यांमध्ये लठ्ठपणा वाढत जाते तसे शरीरात चरबीचे प्रमाण वाढत जाते.वाढलेली चरबी विविध आजारांना आमंत्रण देते.

लठ्ठपणा कसा मोजायचा?

आंतरराष्ट्रीय संकेतानुसार व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणे आवश्यक असते.हे वजन व उंचीचे प्रमाण असते.व्यक्तीचे वजन त्याच्याच उंचीच्या प्रमाणात आहे किंवा नाही याची माहिती BMI वरून समजते.



बी एम आय =व्यक्तीचे वजन (कि ग्रॅ) /व्यक्तीची उंची ( मी)

स्त्रियांच्या कमरेचा घेर ८०सेमी पेक्षा अधिक असेल आणि पुरुषाच्या कमरेचा घेर ९० सेमी पेक्षा अधिक असल्यास लठ्ठपणा असतो,असे समजावे.

लठ्ठपणामुळे होणारे परिणाम:-
Diagram of obese


१)दैनंदिन व्यवहारात चालणे,उठणे यात अडचण निर्माण होते.
 २)लठ्ठपणामुळे उदासीनता निर्माण होते.
 ३)यकृतात पित्ताचे खडे होणे
 ४)लठ्ठपणामुळे शरीरातील सर्व भागावर ताण पडतो,त्यामुळे मधुमेह टाइप 2 हा आजार होण्याची शक्यता असते
 ४)पायांना सूज येणे,पायाच्या पोटऱ्या दुखणे,गुडघेदुखी आणि घोट्याचे आवरण झिजणे इ.दुखणी चालू होण्याची शक्यता असते.
५)घोरण्याचा आजार बळावणे.
६)हृदयविकाराचा धोका लहान वयात वाढणे,अतिरक्तदाब वाढणे आणि काही प्रकारचे कर्करोग वाढण्याची शक्यता असते.

मित्रांनो यावरून आपणास कळलच असेल , लठ्ठ व्हायचे की मजबूत.





Sunday, 25 June 2017

Fruit information in Marathi (jujube)

Jujube or berry fruit information in Marathi.Here you can read more information about it.Bharat is the native place of this fruit .

बोर
रामायणात शबरीने भगवान रामासाठी बोरे गोळा करून ठेवली होती.यांच्यावरून आपणास असे समजते की,बोर हे फळ किती प्रसिद्ध व चविष्ट आहे.बोराचे मूळ वास्तव भारतातच.हिवाळा आला की रानातल्या मेव्याला उधाण येते .मनसोक्त बोरे खायची आणि उरलेली वाळवून त्याचे बोरकूट बनवायचे.

बोराचे बोटॅनिकल नाव zizyphus jujuba असे आहे.विविध प्रदेशानुसार बोराच्या विविध जाती पाहायला मिळतात,जसे की काशीबोर,राजबोर,सुरतीबोर,अजमेरबोर इ.बोराचे झाड पंधरा-वीस फुटाचे ,काटेरी असते.कठीण बियाच्या या फळाची साल मात्र पातळ आणि चमकदार असते.आधी झाडावर हिरवीगार असणारी ही फळे मग पिवळी आणि गर्द लाल होतात.कलम केलेली बोरे झाडाच्या,फळाच्या आकारमानात वेगळी असतात.कलमी बोराच्या बागेतून उत्पन्न भरपूर येते.

या फळात आढळणारे आहारमुल्ये

कॅल्शियम,फॉस्फरस,लोह,कॅरोटीन,थायमिंन,नियासीन,रिबोफ्लेविन ,जीवनसत्व क

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे

१)पोट साफ होण्यास हे उत्तम फळ आहे.
२)अतिसारात सारखी तहान लागणे,पाचक    म्हणून,शारीरिक थकवा घालवण्यासाठी,दाहशामक,मांसवर्धक इ . गोष्टीसाठी त्याचा उपयोग होतो.
३)बोराची फुले रंगकामत वापरतात.
४)बोराची आठळी बलवर्धक ,वीर्यवर्धक आणि वातहारक असते.
५)उलट्या होत असल्यास बियांचा काढा देतात
६)स्त्रियांच्या अनेक तक्रारींवर बियांचा काढा उपयोगी ठरतो.


हिवाळ्यात मुबलक प्रमाणात हे फळ उपलब्ध होत असल्याने सामान्य वाटत असले तरी आहरशास्त्रीयदृष्ट्या पोषणमूल्यात सफरचंदापेक्षा सरस आहे.

Saturday, 24 June 2017

Fruit information in Marathi (pistachios)

I am going to explain Pistachio fruit-information-marathi.You can read more information about it.

पिस्ते
हिरवट गुलाबी किंवा हिरवट पिवळ्या रंगाचा गर असणारे,पातळ सालीच्या आत आणि कठीण कवचात अत्यंत सुरक्षित असणारे पिस्ता हे फळ चवीला किंचित खारट असणारे सुक्यामेव्यातील हे फळ.
पिस्त्याचे झाड मोठे दौलदार असते .त्याच्या फांद्या समांतर व सर्व बाजूनी सारख्या फुटतात,  हिरव्यंगार पानांनी लगडून जातात.चवीला छान आणि पौष्टिक असणारे पिस्ते टिकाऊ असल्याने सहज  साठवता येतात. पिस्त्यामध्ये बदामासारखेच गुणधर्म असतात.


या फळामध्ये आढळणारे आहारमुल्ये:/-
लोह,थायमिंन, niyacin, रिबोफ्लेविन,फायबर,कॅरोटीन, कॅल्शिअम,फॉस्फरस


या फळाच्या सेवनाने होणारे फायदे:--

१)पिस्त्यातील प्रथिने अशक्तपणावर टॉनिक समजले जाते.
२)आइस्क्रीम,मिठाई,केक,बिस्किटे यामध्ये पिस्त्याचा वापर करतात.
३)अनेक आशियाई देशात पिस्ते जेवणानंतर मुखशुद्धी म्हणून करतात.
४)पिस्त्याचे सेवन केल्यास स्मरणशक्तीत वाढ होते.
५)मज्जतंतूंना बळकटी यावी यासाठी दुधात पिस्त्याची पूड,मध घालून देतात.
६)हृदयाच्या स्नायूंना बळकटी देतात
७) अशक्तपणा दूर करते
८)पिस्त्याचे आवरण उलट्या,पोटदुखी आणि बद्धकोष्ठता यावर उपयुक्त आहे.पचनसंस्थ्याच्या तक्रारींवर ते वापरतात
९)पिस्त्याचे फुले औषधी असून ती जुनाट खोकला,दमा,धाप लागणे,यावर गुणकारी आहेत.
१०)पिस्त्यामधून निघालेलेल्या तेलात औषधी  गुणधर्म असतात,त्यामुळे पोटातील जंत बाहेर पडण्यास मदत होते.


पिस्ते आकर्षक दिसत असले,चवीला छान लागत असले तरी खरावलेले पिस्ते स्थूल व्यक्ती,हृदयरोगी किंवा किडनी पेशन्ट यांनी जपूनच वापरावे.

Wednesday, 21 June 2017

Importance and rules of yogasanas in Marathi

Third international yog day.I am going to explain importance and rules of yogasanas in Marathi.

योगासने महत्व आणि नियम
शरीराचे अंतरंग व बाह्यांग निरोगी,उत्साही ठेवण्याची क्रिया म्हणजे योगासने .शरीर व मनाचा ऐकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे.यापैकी एक जर कमकुवत असेल, तर दुसरे सुदृढ असू शकत नाही.म्हणूनच हजारो वर्षापूर्वी ग्रीक लोकांनी,'निरोगी शरीरात निरोगी मन वास करते' (A sound mind in a sound body)हे ओळखले होते
दैनंदिन हालचालीमुळे,भोजनामुळे आणि पेयांमुळे शरीरामध्ये जे मलमूत्र व त्याज्य पदार्थ निर्माण होतात , ते पुढीलप्रमाणे विविध मार्गांनी बाहेर पडतात.
१)त्वचेद्वारे २)जननेंद्रियाद्वारे ३)गुदद्वारे ४)मुखाद्वारे ५)कानाद्वारे ६)नेत्राद्वारे ७)नाकाद्वारे
या सात मार्गानी शरीरातील मलमूत्र पुरेशा प्रमाणात व नियमीतपणे उत्सर्जन झाले नाही ,तर नानाप्रकारचे  रोग होण्याची शक्यता असते. योगासनामुळे मलमूत्र ,त्याज्य पदार्थ वरील मार्गानी नियमितपणे बाहेर पडतात व शरीर निरोगी रहाते.

योगासनाचे महत्त्व

व्यायामाच्या विविध पद्धतीच्या तुलनेत योगासनांची पद्धत अधिक लाभदायक आहे .त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१)व्यायामाच्या इतर पद्धतीमुळे बाह्यअवयवाचे व्यायाम होते.अंतर्गत अवयवाची हालचाल होत नाही.मात्र योगासनांने बाह्य अवयवयांचा आणि अंतर्गत अवयवाचा व्यायाम पुरेशा प्रमाणात होतो.
२)योगासनांसाठी मर्यादित जागेची व कमी साधनांची जरूरी असते
३)इतर व्यायामपद्धतीत अनेकदा जोडीदाराची आवश्यकता भासते ,परंतु योगासनात व्यक्ती एकट्यानेच आसने करू शकते.
४)योगासनात अधिक आहाराची जरुरी भासत नाही,त्यामुळे विशेष खर्चही करावा लागत नाही.
५)योगासनामुळे मलमूत्र  आणि शरीरातील  त्याज्य पदार्थ व्यवस्थितपणे उतसेर्जित होतात.परिणामी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीर व्याधीमुक्त होते
६)योगासनामुळे शरीर लवचिक बनते.त्यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो,काम करण्याची शक्ती वाढते
७)योगासने व प्राणायामामुळे रुधिराभिसरण वाढते व रक्त मोठ्या प्रमाणात शुद्ध होते.
८)पाठीच्या कण्याच्या लवचिकपणावर मनुष्याचे तारुण्य व स्वास्थ्य अवलंबून असते.योगासनामुळे पाठीचा कणा लवचीक ठेऊ शकतो.
९)योगासने करताना शक्तीचा अत्यंत कमी प्रमाणात वापर होतो ; त्यामुळे फारसा थकवा जाणवत नाही,म्हणूनच योगासनाना अहिंसक क्रिया म्हणतात.
१०)योगासनामुळे मानसिक स्वास्थ्य प्राप्त होते आणि बुद्धीचा विकास होतो.
११) योगासनाद्वारा शरीरातील वेगवेगळ्या ग्रंथी कार्यरत होऊन त्या ग्रंथीमध्ये योग्य प्रमाणात स्त्राव उत्पन्न होऊन शरीराचा संतुलित विकास होतो
१२)योगासने व प्राणयामामुळे बद्दकोष्ठ, वायूविकार,मधुमेह,रक्तदाब ,डोकेदुखी व इतर व्याधी बऱ्या होऊ शकतात .
१३)वृद्ध स्त्री-पुरुष देखील योगासने करू शकतात.ही व्यायाम पद्ध्ती संपूर्ण भारतीय आहे.आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपासून ही पद्धत स्वीकारली होती.त्यामुळे दीर्घकाळापर्यंत ते निरोगी व स्वस्थ जीवन जगू शकत होते.
१४) योगासनामुळे हृदय ,फुफ्फुसे व मज्जारज्जू सशक्त बनतात व त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होते.
१५)योगासनामुळे मानसिक समाधान आणि शांतता मिळते.
१६)वेगवेगळ्या योगासनाद्वारे शरीरातील वेगवेगळ्या केशवाहिन्यातील रक्त शुद्ध करता येते.
१७) नियमितपणे योगासने करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरात कोणतीही अशुद्धता राहत नाही.

योगासनांची काही नियम:-

१) योगासने सकाळी प्रातर्विधीनंतर करावीत.जर स्नानानंतर योगासने करता आली तर उत्तम;कारण स्नानानंतर शरीर हलके व प्रसन्न बनते.
२) योगासनांनंतर अंघोळ करायची असेल तर कोमट पाण्याने अंघोळ करावी.
३)योगासने करण्याची जागा स्वच्छ ,सपाट,हवेशीर, प्रकाशयुक्त आणि शांत असायला हवी.अशा जागी सतरंजी अंथरून त्यावर योगासने करावीत.
४)योगासने करताना पुरुषासाठी लंगोट,जंगीया किंवा हाफपॅन्ट आणि स्त्रियांसाठी पंजाबी ड्रेस किंवा स्लॅकस हा अधिक अनूकुल असा पोशाख आहे.
५) योगासने करताना बोलू नये .एकाग्रतेने योगासने करावीत.श्वासावर तसेच शरिराच्या ज्या भागावर दाब पडत असेल त्या भागावरच लक्ष केंद्रित करावे.
६)योगासन ही अहिंसक क्रिया असल्याने ,तेंव्हा शरीराला हिसके देऊन आसने करू नयेत.
७)योगासनांचा सराव हळूहळू वाढवला पाहिजे.असे केल्याने शरीर लवचिक बनते व थोड्या अवधीतच आसनांची पूर्ण स्थिती प्राप्त करू शकते.
८)योगासने करताना नियमितपणा असायला हवा .नाहींतर अनियमिततेमुळे हानी होऊ शकते.
९)योगासन ही विज्ञानाधारीत प्रक्रिया आहे.तिचा संबंध आंतर-बाह्य भागांशी आहे.म्हणून तज्ञांच्या  मार्गदर्शनाखाली शिकून मगच करावीत
१०)शक्यतो हलका आहार घ्यावा,जेणेकरून शरीर हलके राहील
११)आजारी असल्यास ,ताप आला असेल, खूप थकवा आला असेल तर आसने करू नयेत .
१२)योगासनांची संख्या व त्यासाठी लागणारा वेळ हा वाढवला पाहिजे
१३) पहिल्याच दिवशी जास्त आसने करण्याचा  मोह धरू नये.
१४)कोणत्याही योगासनांच्या  प्रारंभिक स्तिथीतून अंतिम स्थितीत अंतिम स्थितीतून प्रारंभिक स्थितीत येताना घाई-गडबड करू नये.
१५)योगासने करताना मन शांत असणे आवश्यक आहे.
१६)योगासने केल्यानंतर थकवा वाटला नाही,शरीर हलके वाटले आणि काम करण्याचा जोम वाढला,तर असे समजावे की योगासने चांगल्या प्रकारे करता येतात.
१७)योगसने  केल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे,त्यामुळे थकवा नाहीसा होऊन शक्ती संचय होतो
१८)योगासन करताना यौगिक क्रिया ठराविक क्रमाने करणे आवश्यक आहे.या क्रमाबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Tuesday, 20 June 2017

Introduction of yogasanas in Marathi

तिसऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त

भारतात फार प्राचीन काळापासून योगाभ्यास करण्याची परंपरा चालत आलेली आहे.हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी लोकांच्या कल्याणासाठी योगाभ्यासाची रचना केली होती.योगाचे स्वरूप अत्यंत व्यापक असून कोणत्याही एका व्याख्येत बद्ध केले जाऊ शकत नाही
योग हा शब्द संस्कृत असून ,तो' युज्' या धातूपासून बनला आहे.याचा अर्थ एकत्र करणे वा जोडणे असा आहे.योगामुळे आत्मा व परमात्माचे एकीकरण होय.योग हे एक कार्यकुशलता, मनाच्या भावनांवर अंकुश ठेवणे व सत्याची प्राप्ती यांचे साधन मानण्यात आले आहे.शरीराचे व मनाचे स्वास्थ्य टिकवणारी ही भारतीय व्यायांम पद्धत मधल्या काळात दुर्लक्षित झाली होती.परंतु आता लोकाना या पद्धतीचे महत्व पटले असून विविध व्याधीच्या निवारणासाठी,रोगाच्या निवारणासाठी आज जगभर योगासनांचा वापर केला जात आहे.

योगसूत्रात महर्षी पतंजली यांनी शरीर व मनाच्या शुद्धीकरिता योगाची आठ अंगे सांगितली आहेत.त्यास अष्टांग योग असे संबोधले जाते. ही आठ अंगे खालील प्रमाणे--१)यम २)नियम ३)आसन ४) प्राणायाम ५)प्रत्याहार ६)धारणा ७) ध्यान ८)समाधी अशी आहेत.

Introduction of yog

या अंगाचे थोडक्यात विवेचन पुढीलप्रमाणे:-
१) यम:-यम म्हणजे निग्रह ,निग्रह म्हणजे काही विशेष प्रकारची कामे न करणे. यमाचे प्रकार पाच आहेत.
अहिंसा, सत्य ,अस्तेय,ब्रम्हचर्य आणि अपरिग्रह
कोणत्याही प्राण्यास त्रास न देणे -अहिंसा
कानांनी जे ऐकले,डोळ्यांनी जे पाहिले तेच प्रस्तुत करणे -सत्य
चोरी न करणे,दुसऱ्याच्या धनाचा लोभ न ठेवणे- अस्तेय
सर्व इंद्रियासह विषय-विकारावर संयम ठेवणे -ब्रम्हचर्य
भोगलालसा ठेऊन योग होऊ शकत नाही, विलासी व संग्राहक वृत्तीचा त्याग -अपरिग्रह

२)नियम:- नियमाचे प्रकार पाच आहेत.
शौच, संतोष,तप, स्वाध्याय आणि ईश्वराचे ध्यान
शौच:-शरीर व मनाचे पावित्र्य हा आहे
संतोष:-अनुकूल व प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनाने प्रसन्न राहणे.संतोष हे सर्वश्रेष्ठ अशा सुखाचे नाव आहे.
तप:-सुखदुःखाचे प्रसंग सहन करणे
स्वाध्याय:-विचारांची शुद्धी आणि ज्ञान प्राप्तीसाठी विचाराचे केले जाणारे आदानप्रदान
ईश्वराचे ध्यान:- मन , वाचा,कृती यांनी ईश्वराची भक्ती करणे

३)आसन:-योगाची  ही तिसरी पायरी.योगाचे एक महत्त्वपूर्ण अंग.महर्षी पतंजलीने योगसूत्रात आसनास स्थिरसुखमासनम् असे म्हटले आहे. याचा अर्थ -शरीराची अशी स्थिती की,ज्यात शरीर स्थिर राहावे आणि मनाला सुखाची अनुभूती यावी,ते आसन होय.आसन केल्याने शरीरशुद्धी,नाडीशुद्धी, स्वास्थ्यवृद्धी होऊन तनमनाला स्फूर्ती प्राप्त होते.अशा प्रकारे नियमित आसने केल्यास शरीर योगाभ्यासाठी शक्तीशाली बनते.

४)प्राणायाम:-योगामध्ये प्रणायामाला महत्वपूर्ण स्थान आहे.प्राणायामाचा उद्देश शरीरातील प्राणशक्तीला उत्प्रेरीत, संचरित,नियमित व संतुलित करणे हा होय.ज्या  प्रकारे शरीर निरोगी, स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी स्नानाची आवश्यकता असते;त्याचप्रमाणे मन स्वच्छ व शुद्ध ठेवण्यासाठी प्राणायामाची आवश्यकता असते.

५)प्रत्याहार:-ज्या अवस्थेमध्ये इंद्रिये बाह्य व विषयापासून मुक्त होऊन अंतर्मुख बनतात, त्या अवस्थेला प्रत्याहार म्हणतात. यामुळे साधकाचे चंचल मन व स्वेच्छाचारी इंद्रिये शांत व स्थिर होतात.

६)धारणा:-मन एकाग्र करणे म्हणजे धारणा होय.धारणेद्वारा शांत चित्तवृत्ती कोणत्याही एका ठिकाणी केंद्रित करता येते.

७)ध्यान:- ध्यानाच्या सरावाने खरे खोटे ,चांगले-वाईट परखण्याचा विवेक जागृत होतो.सर्वत्र तटस्थ भावनेने पाहण्याची शक्ती निर्माण होते.

८)समाधी:-साधकाला फक्त ध्येयाच्या स्वरूपाचीच जाणीव राहते,तेंव्हा साधक ध्यान अवस्थेतुन समाधी अवस्थेत प्रवेश करतो.ध्यानाची परिसीमा म्हणजे समाधी होय.सांसारिक प्रलोभनामुळे चित्ताची एकाग्रता विचलित होत असते,या पासून दूर राहण्यासाठी चित्ताची एकाग्रता वाढवली पाहिजे.

योगाची पहिली पाच अंगे-यम, नियम ,आसन,प्राणायाम व प्रत्याहार याना बाह्यांग योग म्हणतात; तर ध्यान ,धारणा,समाधी याना अंतर्गत योग किंवा संयम म्हणतात.
या अष्टांग योगाचा जीवनात उलयोग केला तर माणसात सदाचार व सतचरित्र या गुणांचा विकास होतो.याचबरोबर माणसाची शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक प्रगती होते व त्यास शारिरीक व मानसिक स्वास्थ्य मिळते.




Fruit information in Marathi (pears)

Taste of pears like apple and guava.Here I am going to explain fruit information in Marathi.You can read more information about pears fruit

नाशपाती
फिक्कट हिरव्या रंगाचे,खायला अत्यंत चविष्ट लागणारे हे फळ पेरूच्या आकाराचे असते.गराने पूर्ण असे फळ सफरचंद व पेरू यांची एकत्रित चव देते.नाशपतीचे झाड सदैव हिरवे असते.या झाडाला पिवळसर रंगाची सुगंधी फुले येतात.नाशपाती मऊ व कुरकुरीत दोन्ही प्रकारची असते.हे अल्पजीवी फळ असल्याने फ्रिजमध्ये साठवता येत नाही. तेंव्हा तोडल्यानंतर ताजी फळे लवकर संपविणे हाच त्यावरचा मार्ग.ऑलिव्ह सारखेच गुणधर्म नाशपतीत असतात.

नाशपतीचे मूळ हे मध्य अमेरिका .स्पॅनिश लोकांनी या फळाची लागवड मेक्सिको-पेरूपर्यंत केली.आता आशिया खंड,दक्षिण आफ्रिका,आस्ट्रेलियात सर्वत्र नाशपाती पिकते.भारतात काही ठिकाणी या फळाला माखनफल म्हणतात.

या फळामध्ये प्रथिने, फॅट , कॅल्शियम , फॉस्फरस , लोह ,खनिजे ,अ जीवनसत्व, क जीवनसत्व, इ जीवनसत्व ,कार्बोहायड्रेट,फायबर , थायमिन,नियासीन आणि रिबोफ्लेविन ही आहारमुल्ये असतात


नाशपाती सेवनाने होणारे फायदे :-

१) या फळातील प्रथिने उच्च दर्जाची असतात.
२)नाशपतीत भरपूर गर असतो.तो चविष्ट व पचनास सुलभ असल्याने सर्व प्रकारच्या आजारात तो खाता येतो.

३)अनेक प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनामध्ये नाशपाती तेलाचा वापर करतात.हे तेल उत्तम क्लिनसर आणि मॉइश्चरायझर आहे व तसेच उत्तम कंडिशनर आहे.

४) ज्यांना दूध पचत नाही अशांसाठी नाशपाती पाण्यात घुसळून केलेले दूध उत्तम पर्याय होतो. हे दूध तान्ही मुले आणि दुर्बल रुग्ण याना चालते.
५)मुखरोगावर नाशपाती औषध आहे.
६)अतिआम्लतेमुळे होणारे विकार नाशपाती व पपई खाल्याने कमी होतात.

७)पोटातील विकारावर नाशपाती गुणकारी औषध आहे.
८)इसब व सोरायसिस यासारख्या त्वचविकारावर नाशपतीचे तेल गुणकारी ठरते.मात्र,यांचे स्वरूप बाह्योपचाराचे असते.

Monday, 19 June 2017

Fruit information in Marathi (fig)

Here I am going explain fig fruit information in Marathi.You can read more information about it.

अंजीर
मोदकासारखे दिसणारे ,हिरवट लाल रंगाचे हे फळ भरपूर बियानी युक्त असते.या फळाची चव गोड असून फार काळ टिकत नसल्याने जेथे पिकते तेथेच जवळपास विकावे लागते.नाहीतर सुकवून साठवावे लागते .पिकलेला अंजीर चवीला खूप गोड लागतो व खाल्याचे समाधान मिळते.

आपल्याकडे महाराष्ट्र,गुजरात, कर्नाटक व उत्तर प्रदेशात मुबलक पिकते.

या फळामध्ये आढळणारे आहारमुल्ये
कर्बोदके,फॅट ,फायबर ,खनिजे ,कॅल्शियम,फॉस्फरस ,लोह ,जीवनसत्व अ ,जीवनसत्व क व जीवनसत्व ब

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे
१)अंजिराचा उपयोग केक,मिल्कशेक,आइस्क्रीम,मिठाई व पुडिंग्स यामध्ये करतात
२)अंजीर शक्तिवर्धक व उत्साहवर्धक असतो.रुग्णाची शक्ती क्षीण झाली असेल तर अंजीर खातात.
३)मानसिक व शारीरिक थकवा नाहीसा होतो.
४)जिभेला चिरा पडल्यास किंवा ओठ फटल्यास अंजिराने जखमा नाहीश्या होतात.
५)या फळाची साल जाड असल्याने शौचास साफ होते.
६) अंजिराच्या बियामुळे आतडे आंकूचन प्रसरण पावतात,त्यामुळे पचन नीट होते.पोटातील घाण निघून जाते.
७) नियमित अंजीर खाल्यास मूळव्याधीचा बिमोड होतो
८) दम्यामुळे छातीत कफ निर्माण झाल्यास अंजीर खाण्याने पातळ होऊन आराम वाटतो.

Sunday, 18 June 2017

Fruit information in Marathi. ( jambhul )

Jambhul fruit information in Marathi.Here I am going to explain fruit information about jambhul fruit

जांभळे
उष्ण कटिबंदाच्या प्रदेशात येणारी, काळपट दिसणारी,आतला गर जांभळाआणि बी हिरवट पांढरी आलेली जांभळं काही गोल तर काहि लांबट असतात.जांभळाचे झाड मोठे असते.पण एकदा झाड आले की साठ-सत्तर वर्षे फळ देते.लहान मुलांना तर जांभळे खूप आवडतात.कारण जीभ ,तोंड जांभळं होतं.


जांभळाचे बोटॅनिकल नाव Sysygium cumin असे असून जांभळावर अनेक संशोधन होत आहे .सीडलेस आणि गोड गराच्या जाती शोधल्या गेल्या आहेत.
जांभळे चवीला आंबट-गोड असणारी,पण खूप खाल्ली तर तोटरा बसणारी असतात.शहरात आणि खेडेगावात सहज उपलब्ध असतात .
उन्हाळ्यात आंब्याचे दिवस संपतात आणि जांभळे बाजारात येतात .याची फळे साधारणपणे जून-जुलैमध्ये येतात.

या फळामध्ये उपलब्ध असणारे आहारमुल्ये 
फॅट,लोह,कॅल्शियम,फॉस्फरस,पोटॅशियम,सोडियम
,मॅग्नेशियम,फॉलीक ऍसिड,कॅरोटीन आणि तंतुमय पदार्थ

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे


,१) जांभळे खाल्याने रक्त शुद्ध व लाल बनते.
२)जांभळीच्या सालीचा वापर कापड कातडे रंगविण्यासाठी करतात.
३)जांभळाचे बी, साल आणि पाने औषध म्हणून वापरतात.
४)जांभळाचे लाकूड घरासाठी आणि शेतीची अवजारे बनवण्यासाठी वापरतात.
५)नियमित जांभळे खाल्यास पोटात गेलेला केस बाहेर पडते.
६)जांभळाचे बी मधुमेहावर उत्तम औषध आहे .
न७)प्लीहा,यकृताच्या रोगावर जांभळे गुणकारी असतात.
८)liver extract सारख्या महागड्या injection ऐवजी स्वस्त जांभळाचा उपयोग करणे फायद्याचे आहे.
९)जांभळातील पुरेशा लोहतत्वामुळे पंडुरोग व कावीळसारखे रोग बरे होतात आणि मुत्रनळीची सूज कमी होते.
१०)जांभूळ मधुमेह, अतिसार, मुरडा, रक्तपित्त व लिव्हरचे विकार यावर गुणकारी औषध आहे.
११) जांभळाच्या बियाच्या पावडरचे सेवन केल्यास त्याचाही फायदा होतो.

 अशी ही जांभळे अति खाल्यास छातीला त्रासदायक ठरतात.कदाचित कफ व थुंकी फुफ्फुसात साठण्याचा धोका असतो.





Saturday, 17 June 2017

Fruit information in marathi

Fruit Amla information in marathi
आवळा-
आवळा आहारशास्त्रात मानाचे स्थान आहे ,अनेक औषधामध्ये याचा समावेश होतो .अमृताचे गुण देणारे कल्पवृक्षीय फळाला सुश्रुतने अग्रक्रम दिलेला आहे.आवळ्याचे बोटॅनिकल नाव Emblica Officinalis किंवा Phyllantus Emblica असे आहे.


आयुर्वेदिक शेतामध्ये आवळा हे प्रमुख उत्पादन  आहे.आवळ्याचे झाड साधरपणे पंधरा ते वीस फुटाचे असते.पाने छोटी पण हिरवीगार असतात.आवळ्याचे आकारावरून विविध जाती असतात मोठ्या सुपारीएवढे फळ असते.
साधरपणे ऑक्टोबर -डिसेंबरमध्ये ही फळे चाखायला मिळतात .
हे झाड परसबागेत ,जंगलात,मोकळ्या जागेत येतात.गुजरात,बनारस,हरिद्वारमध्ये आवळ्याचे पीक भरपूरयेते.
या फळामध्ये लोह,फॉस्फरस,फॅट,फायबर,कॅल्शियम,कार्बोहायड्रेट,बी जीवनसत्व ,सी जीवनसत्व हे तत्व आढळतात.

या फळाच्या सेवनाने होणारे फायदे-
१)उत्साह व शक्तिवर्धक गुणामुळे हृदयरोग्यांना आवळा वरदान आहे.
२)नियमित सेवनाने त्वचा कांतिमान होते.अनेक त्वचारोगावर आवळा रामबाण औषध आहे आणि वार्धक्य विलंबाने येते.
३)केसांसाठी आवळा जास्त फायद्याचे आहे.केसगळती थांबते,केस लांब होतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चमकदार व काळेभोर होतात.केसांसाठी आवळा उत्तम कंडिशनर आहे.
४)यकृताच्या अनेक तक्रारीवर उपयोग होतो
५)स्कर्वी रोगावर मात करण्यासाठी आवळ्याचा उपयोग होतो.
६)डोळ्यांसाठीही आवळा हितकारक असल्याने मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यावरील परिणामांना आवर घालता येतो.
७)मधुमेही रुग्णांनी नियमित सेवन केल्यास साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते.
८)आवळा कोणत्याही रूपात खाल्ला तरी चालतो, आवळ्यात सी जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो.
९)आवळ्यात सी जीवनसत्व असल्याने बऱ्याच औषधात त्याचा उपयोग करतात
१०)या फळाचे सेवन सर्व वयोगटातील स्त्री-पुरुषांना हितावह आहे.

आंबट,तुरट ,कडवट ,अशा चवीनी युक्त असणारा आवळा शरीरात जोम व उत्साह निर्माण करतो.आवळा ताजा न मिळाल्यास त्याची पावडर उपयोगात आणावी.त्रिफळा चूर्ण , च्यवनप्राश या लोकप्रिय औषधामध्ये आवळा वापरला जातो.मातेच्या ठिकाणी जसे ममत्वाचे व उपकारक गुण असतात तसेच आवळ्याच्या ठिकाणी असल्यामुळे त्याला धात्रीफळ असेही म्हणतात

कच्या आवळ्याचे सरबत-

कच्या आवळ्याचा रस काढून घ्यावा. रसाच्या मापाच्या चौपट साखर घ्यावी.साखरेचा २ तारी पाक करावा.पाक थंड झाल्यावर रस मिसळून एक उकळी आणावी व थंड करून स्वच्छ बतल्यात भरून ठेवावे.
हे सरबत अतिशय उत्साहवर्धक आहे.त्यामुळे खूप कामाने, अभ्यासाने,प्रवासाने आलेला थकवा दूर होतो.बाजारातील हानिकारक शीतपेय पिण्यापेक्षा आवळा सरबत पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे.आवळा सरबत अभ्यासू मुलांना रोज पिण्यास द्यावे.


Friday, 9 June 2017

Fruit information in English (lichi)


      Here I am going to explain lichi fruit information in marathi and English.
You can read information about it .This fruit is most important for health .
Fruits info
   lichi  is called summer fruit. it is to win the juicy flavor is equally proves beneficial for health .these fruit contains carbohydrates, present nutrients such as vitamin C, vitamin A, vitamin B complex. Not only potassium phosphorus and rich minerals such as iron .
Daily removes many of the troubles of taking litchi  
1) blood pressure: -
In litchi Beta-carotene is very important element for the health of the heart . It does keep beating stable potassium heart and overcome the problem of blood pressure.

2) prevention of cancer: -
A lichi study has found cancer properties fighting cells does not increase sales of cancer by taking daily.

3) digestion: -
Carotene, vitamin B, found a considerable amount in lichi  it do produce blood cells and improves     digestion .

4) development of children: -
Calcium, phosphourus, potassium, B vitamins are present, which play an important role in the physical development of children  The lichi bone disease at the same time helps prevent osteoporosis 

5) weight loss: -
 fiber  is quite helpful in reducing weight loss or obesity and to provide immune to fight off viruses and infectious diseases The daily intake is weight control .

6) the development of the skin: -
lichi prevents ultraviolet U.V rays of our skin and body .Daily problem spots ,oily skin by taking it too far.

Saturday, 3 June 2017

Body cleansing at home [tratak ]

  Body cleansing process at home named [TRATAK]

 मानवी डोळे हे तर आपले कलर्ड मुव्हीज कॅमेरा आहेत .या डोळ्यांनी जगातील सौंदर्य पाहू शकतो ,जगातील वस्तूचे नेत्र सुख घेऊ शकतो .अशा डोळ्याची काळजी घेणे  फार महत्वाचे आहे .त्यासाठी हठ्योगामध्ये नेत्राची, नेत्रमार्गाची शुद्धी कशी करावी ? ते सांगितलेले आहे .चला तर पाहूया ती कृती कोणती ?

त्राटक :-एखाद्या लक्ष्यावर दृष्टी स्थिर ठेवणे म्हणजेच त्राटक होय. मात्र दृष्टी स्थिर ठेवण्याकरिता मनही स्थिर ठेवले पाहिजे .

 त्राटक करण्याची कृती :--

१) मोकळ्या भिंतीवर सूक्ष्म ठिपका काढा किंवा टिकली चिकटवा .
२) साधकाने भिंतीपासून साधारण:३ फुट अंतरावर सतरंजीवर बसावे .
३) हि टिकली किंवा ठिपका नजरेच्या उंचीवर लावावे .
४) पद्मासनात बसा ,पद्मासनात स्थिर व सुखकारक वाटत नसेल तर वज्रासनात किंवा सहजासनात  बसावे .
५)स्थिर बसल्यावर लक्ष्याकडे पहा ,पापण्याची हालचाल करू नका
६) टिकलीकडे मन एकाग्र करून पहा ,दुसर्या वस्तूकडे पाहू नका
७) जेवढा वेळ शक्य होईल ,तेवढा  वेळ हालचाल न करता  स्थिर बसा.
८) डोळ्यातील अश्रुपिंडावर ताण पडून अश्रू बाहेर येऊ लागतील .काही वेळाने डोळ्यात बरेच पाणी गोळा होईल व नंतर डोळ्यातून अश्रूचा थेंब ओघळेल .हि स्थिती आली कि त्राटकाची अंतिम मर्यादा संपली असे समजावे .
९) मग सावकाश डोळे बंद करा ,डोळ्यापुढे पाहिलेल्या बिंदूची प्रतिमा दिसू लागेल .काही वेळाने हि प्रतिमा नाहीशी होईल .
१०) नंतर दोन्ही हाताच्या तळव्यानी डोळ्यावर हलकेच दाब  द्या व तेथिल स्नायुवरील ताण काढून टाका
११) अलगद डोळे उघडा व डोळे थंड पाण्याने धुऊन टाका .

    त्राटकाचे  काही प्रकार :- १) ज्योती त्राटक ,दिर्घसूक्ष्म त्राटक , शिखर त्राटक


Body cleansing process at home using TRATAK in yoga

   त्राटकाचे परीणाम :-

१) दृष्टीची चंचलता कमी होते , डोळ्यातून पाणी येत असल्याने डोळ्याची स्वच्छता होते
२ )नियमित अभ्यासाने दृष्टी तीक्ष्ण बनते व वेधकही बनते .
३ )अन्य व्यक्तीच्या अन्तरगात डोकावणे सोपे जाते .डोळ्याचे काही विकार नाहीसे होतात .
४)त्राटक हि डोळ्याची व मनाची शुद्धीक्रिया आहे .मानवी मनात निर्माण झालेल्या भावना अश्रूच्या माध्यमातून प्रगट केल्या जातात . अश्रू येणे व मनावरील ताण कमी होणे हा परस्पर संबंध आहे .मनावरील ताण कमी होणे म्हणजेच मन शुद्ध होणे .

विशेष दक्षता :-दृष्टीदोष व डोकेदुखीच्या रुग्णांनी हि प्रक्रिया करताना योग्य मार्गदर्शन घ्वावे .चष्मा असणाऱ्यांनी शक्यतो चष्म्याशिवायच त्राटकाचा अभ्यास करावा .योगासन प्राणायामाप्रमाणे त्राटकाच्या आवृत्या करू नयेत .अश्रूचा थेंब पडणे ही मर्यादा समजावी .

Body cleansing process at home named [TRATAK]

Human eyes are our color cameras .This eyes can see the beauty of the world, and the eyes of the world can take pleasure .It is very important to take care of such an eye .That is how to clean the eyeball in the neck, It is said that if we do,

Tratak process

Tratak - To keep an eye on a target of a certain goal is constraint. However, the mind should be kept constant to maintain the vision.

Harassment action: -

1) Remove a miniature dotted on an open wall or stick to a timer.

2) The seeker should sit at the station level at a distance of 3 feet from the wall.

3) These should be fixed or fixed at the height of the eyes.

4) If you do not feel stable and happy in Padmasana, sit in Padmasana

5) Look at the target when you are stable, do not move to sin

6) Try concentrating on Tikli, do not look at anything else

7) As long as possible, sit still without making any effort to do so.

8) The tears of the eye begin to come out of tears .There will be lots of water collected in the eye at the same time and then the tears will pour out from the eye .It appears that the final limit of the trauma is over.

9) Then close the eyes slowly, the image of the point seen in front of the eye will appear .Soon this image will disappear.

10) Then press lightly on both the palms of your palms and remove the tension on the nerves

11) Open wide open eyes and eyes with cold water.


Some types of tratak: - 1) Jyoti Tratak,2) long-term tratak,3)peak tratak

Stretch results: -

1) Visibility reduces, eye irritation occurs due to water coming from the eye

2) Regular exercises make the vision sharp and they are also made.

3) It is easy to sneak into other person 's spots. Some diseases of the disease are removed.

4) Tract is the correctness of the eyes and mind .The feelings created in human mind are revealed through tears. Lack of tears on the skin, ie refraining tears, is the relation of reducing stress.


Special Efficiency: - Obesity and headache patients should get proper guidance in this procedure. Those who have prescribed medicines should study the tract without even specs .Yoga should not be done in accordance with pranayama. Do not make the recurrence of tremor.

You can join me on social media 
      1) join me facebook page
      2)follow me twitter
      3)join me google plus 
      4)join me linkedIn

Friday, 2 June 2017

Body cleansing at home [using eye glass]


This post related with Body cleansing at home [using eye glass]


       वातावरणातील वाढते हवेचे प्रदूषण ,वाढते शहरीकरण यामुळे धुळीचे प्रमाण खूप वाढले आहे .या धुळीचे डोळ्यावर खूप वाईट परिणाम होतात .त्यातून डोळ्याचे विविध विकार होतात .डोळे स्वच्छ राहावे ,निरोगी राहावे यासाठी नेत्राप्रक्षालनाची प्रक्रिया उपयोगी पडते .आजूबाजूचे वातावरण धुलीकामय असेल तर रोज एक वेळा प्रक्षालन क्रिया करावी .

  नेत्रप्रक्षालन :-
        
 नेत्रप्रक्षालन म्हणजे डोळे धुणे .डोळे हा अतिशय नाजूक व संवेदनक्षम अवयव आहे व बाह्य वातावरणाशी सतत संपर्कात येणारा आहे .त्यामुळे डोळ्याची शुद्धी करण्यासाठी हि प्रक्रिया सांगितलेली आहे .हि क्रिया करण्यासाठी विशिष्ठ पात्र लागते .त्या पत्राचे नाव -नेत्राप्रक्षालन पात्र

Body cleansing at home{using eye glass}
EYE GLASS
 नेत्र प्रक्षालन करण्याची कृती :-

1)    नळाचे थंड पाणी वापरावे .मात्र ते पाणी अति थंड व अति उष्ण असू नये .
२)    पाणी पूर्णपणे स्वच्छ असावे .म्हणजे त्यात कचर्याचे कण राहणार नाहीत याची  काळजी घ्यावी .

३)   नेत्र प्रक्षालन स्वच्छ धुऊन त्यात स्वच्छ पाणी काठोकाठ भरा .त्या पात्रात डोळा बुडऊन ,पापण्यांची दहा बारा वेळा पापण्यांची उघडझाप सुरु करा.त्यातील पाणी टाकून त्यात नवीन पाणी भरा व पुन्हा पापण्यांची उघडझाप करा .

४)  प्रत्येक डोळा चार पाच वेळा धुऊन स्वच्छ करा व कोरड्या टौवेलने डोळे अलगद टिपून घ्या .

Increasing air pollution in the atmosphere, due to the increasing urbanization of dust has increased very much .This has very bad effects on the dust .There are various eye disorders in it .To keep the eyes clean, the diaphragmatic process is useful to stay healthy .If the atmosphere is dusted, Do it.


Eye Exposure: -eye glass

Eye operation is the washing of eyes .The pill is a very delicate and sensitive element and is constantly exposed to external environment .Therefore it is in this process to correct the eyes .This action takes the particular character .The name of the letter -Eye glass


Eye Washing Procedure: -
9

1) Use water for cooling water; However, the water should not be very cold and hot.

2) The water should be completely clean .It should be kept in mind that it does not contain waste particles.

3) Clean the eyes and clean the lubrication and fill it with clean water in the brim .Keeping the eyelids of the eyelids, pouring water into it, pouring water into it and blinking it again.


4) Wash and clean each eye four times five times and clean your eyes with dry towel.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...