https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Saturday, 24 March 2018

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &
  In this training we got lots of knowledge of spoken and activities which is helpful for students.






U can watch dramatisation video here
                     Click here

My achievement

      I have taken exam of my students in case of English literature through leap for word .I also have got certificate of achievement by leap for word.


First is that Bronze level achiever


      Second is that Silver level achiever
     
       Third is that Gold level achiever

Monday, 18 December 2017

संत गाडगे महाराज

       संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरिब कुटुंबात इ.स. १८७६ साली झाला. आई बापानी त्यांचे नाव डेबू ठेवले .

        Educational learning in Marathi
   

       स्वतःच्या आयुष्यात आलेल्या खडतर जीवनाचा अनुभव इतरांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी समाजात आयुष्यभर उपदेश करणारे गाडगे बाबा स्वच्छतेचे आग्रही होते.लहानपणापासून त्यांनी निरीक्षण करुन आपल्या आजूबाजूचे दु:ख, दैन्य, दारिद्रय यांचा सखोल अभ्यास केला. डोक्यावर शुभ्र रंग केस,पिंगट डोळे,गोरा रंग,अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड, धिप्पाड देह हातात एक काठी अन एक गाडगे.त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे महाराज म्हणत.

      पुढे जीवनभर समाजातील घाण कचरा काढून ,अस्वच्छ परिसर स्वच्छ करून पोट भरले व इतर वेळेत समाजाला शहाणे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वसामान्य समाज कर्जबाजारी बनला होता. अशा काळात लोकांना शिकून सवरून शहाणे व्हा ,कर्ज काढून नका, प्राणीमात्रावर दया करा, अशा प्रकारचा उपदेश करीत.लोकांना प्रथम प्रश्न विचारून त्याचे उतर लोकांनाच सांगण्यास सांगत.त्यांची चूक लक्षात आणून देत व त्यातून मार्ग कसा काढायाचा यावर मार्मिक उत्तर देत.त्यांनी समाजात वाईट चालीरीती बंद करणासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.
       महारष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाबा स्वतः राबून ,मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यावर घाट बांधले ,पाणपोया उघडल्या. गरीब ,अनाथ आणि अपंगासाठी सदावर्ते सुरु केली . मुलांसाठी शाळा ,महाविद्यालये आणि वसतिगृहे उभी केली. ज्या ठिकाणी दु:ख दिसले त्याठिकाणी बाबा हजार होत .रंजल्या गंजल्या लोकांची सेवा हीच बाबांची देवपूजा  म्हणूनच लोक त्यांना आदरानी गाडगे बाबा म्हणत .


Thursday, 16 November 2017

महात्मा जोतीराव फुले यांची माहिती

विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली |
नीतिविना गती गेली | गतिविना वित्त गेले |
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले| 
                                     -- महात्मा जोतीराव फुले
     
          मराठी लेखक,नाटककार,विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि त्याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
       महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. पेशवांच्या काळामध्ये त्यांचे वडील आणि चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते,त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुणे ते फुले म्हणून ओळखू लागले आणि तेच नाव पुढे रूढ झाले.
जोतीराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .इ.स.१८४२ साली माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि बुद्धी तल्लख असल्याने पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.

      मानवी हक्कावर इ.स.1791 मध्ये थॉमस पेन यांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले.त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले.त्यामुळेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागास जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर भर दिला.सामाजिक भेदभाव शिक्षणामुळे दूर होईल असे त्यांचे ठाम मत आणि अनुमान होते.शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे.
        २४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .समाजातील विषमता नष्ट करणे आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्याना शिक्षण पोहचवणे हे या सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज संस्थेचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते.वेदांना झुगारून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे जातीय भेद आणि स्पृश्य अस्पृश्य भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.सत्यशोधक समाज या संस्थांचे स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले.सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले.छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून आणि गुलामगिरीतून शुद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.या समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली आणि मराठीत मंगलाष्टके लिहिली.
     सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवले जाते.महात्मा फुलें यांचे लेखन साहित्य
   1)  १८५५ साली तृतीय रत्न  नाटक
   २)१८८५ साली इशारा
   ३) १८६९  साली ब्राम्हणांचे कसब  
   ४)१८९१ साली। सार्वजनिक सत्यधर्म
   ५)१८७३  साली   गुलामगिरी
  ६)१८८३ साली शेतकऱ्यांचा आसूड
महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली 

Sunday, 12 November 2017

पंडीत जवाहरलाल नेहरू

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 साली अलाहाबाद या ठिकाणी झाला .14 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करतो,कारण की त्यांना लहान मुले खूप आवडायची.त्यांचा जीवन परिचय पाहण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.
Educational Learning in Marathi

व्हिडिओ साठी येथे क्लिक करा

Monday, 6 November 2017

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची व्हिडिओच्या माध्यमातून माहिती

      दि .7 नोव्हेंबर 1900 साली प्रतापसिंग हायस्कुल राजवाडा चौक ,सातारा या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शाळेत प्रवेश घेतला आणि नवीन युगास आरंभ झाला. या शाळा प्रवेश दिनी महाराष्ट्र शासनाने
7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर

व्हिडिओ साठी येथे क्लिक करा

Sunday, 29 October 2017

संत तुकारामांची मराठीत माहिती

      संत तुकाराम हे इ.स.च्या 16 व्या शतकातील ,शिवाजी महाराजांच्या काळातील एक लोकप्रिय संत.पंढतपुरचा विट्ठल हा तुकारामाचा आराध्य देव .तुकारामांना वारकरी जगदगुरु म्हणून ओळखतात. वारकरी सांप्रदाय किर्तनाच्या शेवटी-पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ,जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात.
मूळ नाव:- तुकाराम बोल्होबा अंबिले ,गुरू:-केशवचैतन्य ओतूर
शिष्य :- निळोबा संत,संत बहिणाबाई
     तुकाराम महाराज हे साक्षात्कारी ,निर्भीड असे संत कवी होते.उशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवणीतून सामान्य माणसापर्यंत पोहचवला.वारकरी,साहित्यिक ,अभयासक आणि सामान्य रसिक आजही त्यांचा अभंगाचा अभ्यास करतात .त्यांचे अभंग अशिक्षित लोकांना पाठांतर आहेत.
       भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य त्यांना लाभले.महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावले आहेत.मंत्र्यांचे पावित्र्य यांच्या शब्दकलेत पाझरते.त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे.
तुकारामांनी तुकाराम गाथा या ग्रंथात अनेक अभंगाचे लेखन केले आहे.त्यातील बरेच अभंग लोकांच्या तोंडी पाठ आहेत.
     चित्रपट:- इ.स.1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत संत तुकाराम या नावाने चित्रपट बनवला.

Saturday, 28 October 2017

डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर
    जन्म १४ एप्रिल १८९१ महु ,इंदौर  (मध्यप्रदेश)
    शिक्षण:M.A. Ph.D ,M.Sc.,D.Sc.,Ll.D.D.Lit. असे एकूण ३२ पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.
  
      जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे पंडित ,लेखक ,समाजसुधारक तत्वज्ञ ,भारतीय संविधानाचे शिल्पकार ,मानवी हक्काचे कैवारी ,स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री होते.याशिवाय डॉ आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ ,मानववंशशास्त्रज्ञ ,इतिहासकार ,शिक्षणतज्ञ ,धर्मशास्त्रज्ञ ,प्राध्यापक,barister ,वक्ते,पत्रकार ,जलतज्ञ, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी ,मजूर मंत्री आणि भारतातील कोट्यावधी शोषित दलितांचे उद्धारक सुद्धा होते .
त्या काळी दलितांना आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी घातली होती ,तेंव्हा बाबासाहेब शाळेच्या बाहेर थांबून,ऐकून  शिक्षण पूर्ण केले. खडतर हाल अपेष्टा सहन करीत ,प्रसंगी उपाशी राहून त्यांनी विविध विषयात पदवी मिळवून देशाची सेवा केली.   

       २०१२ साली सर्वात महान भारतीय या आन्तार्राष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर  सर्वात महान भारतीय म्हणून डॉ .बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झाले आहे .कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार केली त्यात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगात नंबर १ महाविद्वान म्हणून गौरव करण्यात आला .
प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता ,तल्लख स्मरणशक्ती ,प्रगाध  विद्वता असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील  तब्बल ६४ विषयावर प्रभुत्व होते .एवढ्या साऱ्या विषयावर प्रभुत्व असणारे बाबासाहेब जगातील  इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत ,असे इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापिठ्ने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे .

     जातीव्यवस्थेविरुद्ध प्रखर संघर्ष ,महान भारतीय संविधानाचे निर्माते अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी भारत सरकारने भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले .
दलित, शोषित,मजूर आणि स्त्रियांच्या हितासाठी ,कल्याणासाठी खालील संघटना स्थापन करून दलितांचा,शोषितांचा ,मजुरांचा आणि स्त्रियांचा विकास घडवून आणला
१)बहिष्कृत हितकारिणी सभा  २)समता सैनिक दल  ३)अनुसूचित जाती फेडरेशन
४)डिप्रेस क्लास एजुकेशन सोसायटी  ५)पीपल्स इजुकेषण सोसायटी ६ )स्वतंत्र लेबर पार्टी

७ ) भारतीय बौद्ध महासभा 

Thursday, 26 October 2017

Sunsalutation |

सूर्यनमस्कार
        ही भारतीय प्राचीन व्यायाम पद्धती आहे.भगवान सुर्यनारायनाला अष्टांगांनी केलेला नमस्कार होय.प्रातःकाळी पूर्व दिशेला तोंड करून ,सुर्यनारायणाची स्तुती करत सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आहे. 
       संपूर्ण विश्वाला ऊर्जा व प्रकाश देणाऱ्या,ऋतूंची निर्मिती करणाऱ्या आणि  अन्न निर्माण करणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्याने सकाळच्या कोवळ्या किरणांचा शरीराला लाभ होतो .सूर्यनमस्कारामुळे शारीरिक व्यायाम होतो त्याचप्रमाणे विचाराना उत्तेजन मिळते. उगवत्या सूर्याच्या समोर हा व्यायाम केल्याने ,सूर्याच्या किरणाद्वारा जीवनसत्व डी भरपूर प्रमाणात शरीरास मिळते.
सूर्यनमस्कारामध्ये एकूण बारा अवस्था आहेत.या प्रत्येक अवस्थाने शरीराच्या प्रत्येक अवयवास व्यायाम मिळतो.या बारा अवस्थांचा मिळून एक सूर्यनमस्कार होते आणि पंचवीस नमस्काराचे एक आवर्तन होते.
         प्रत्येक अवस्थांची चित्रासह माहिती पुढे दिली आहे.प्रत्येक अवस्थेपासून मिळणाऱ्या फायद्याची माहितीही दिली आहे.सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी प्रथम प्रार्थना म्हणावी आणि प्रत्येक नमस्काराबरोबर सूर्याचे एकेक नाव उच्चारून नमस्कार घालावा.

१) ओम मित्राय नमः 
२) ओम रवये नमः 
३)ओम सूर्याये  नमः
४)ओम  भानवे नमः । 
५)ओम खगाय नमः।    
 ६)ओम पुष्णे नमः। 
७)ओम हिरण्यगर्भय नमः।
८)ओम मरीचये नमः। 
९) ओम आदित्याय नमः
१०) ओम सवित्रे नमः।                       
School Activity of students
११)ओम अर्काय नमः ।
 १२) ओम भास्करा य  नम :                     
                                     Forvideo Click here

Monday, 23 October 2017

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

     कोल्हापुरातील घटना : कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या,उन्हाचा तडाखा बसू लागला.प्रजेच्या डोळ्यातील पाणी आटू लागल .शेतकरी आभाळाकडे टक लावून बघू लागला.कारण १८९६ सालचा पावसाळा कोरडा गेला होता.
     महाराष्ट्रभर दुष्काळाने थैमान घातले होते.माणसे आणि जनावरांची उपासमार होऊ लागली.लोक गाव सोडून जाऊ लागली.शाहू महाराजांचा जीव खाली वर होऊ लागला.त्यांनी दिवान बहाद्दूर रघुनाथराव सबनीसाना आणि निवडक अधिकाऱ्यांना बोलावून घोड्यावरून राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले.गडहिंग्लाज ,भुदरगड ,पान्हळा शाहुवाडी या तालुक्यांची पाहणी केली असता हिरवीगार रान करपून गेली होती .महाराज स्वत: जनतेला धीर देत होते. उन्हातान्हाचा मारा सहन करीत महाराज भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होत होत .
     महाराजांनी व्यापायांची बैठक बोलावून घेतली.परिस्थितीची माहिती दिली त्यांना अये सांगितले कि जर तुम्ही धान्याचा किमती कमी केल्या तर गरीब रयतेला विकत घ्यायला परवडेल.खरेदीच्या दारात प्रजेला धन्य मिळाले त्र्प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि तुमचे नुकसान होऊ देणार नाही.तुमचा तोटा दरबारातून भरून देऊ .त्यामुळे धान्याच्य किमती उतरल्या.प्रजेला रास्त दारात धान्य घ्यायला परवडायला लागलं.
     पाण्याचा प्रश्न: महाराजांनी पाण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या. ‘विहिरीतला गाळ  काढा ,नदीकाठी विहीरी खोदा.दरबारातून लागेल तेवढा खर्च करा.’ असा आदेश दिला.विहिरीच्या गाळ  काढल्याने त्यांची लांबी ,रुंदी आणि खोली वाढल्याने पाणी साठायला लागलं.जनतेसाठी ,जनावरांसाठी पाण्याची सोय झाली.
     जनावरांसाठी चाऱ्याची सोय व्हावी म्हणून छावण्या उभ्या केल्या .त्यांना वैरण ,दाणागोटा देण्याची सोय केली.यावेळी जनावरांची उपासमार थांबली.महाराजांनी हुकुम दिला, “सगळा खजिना रिकामा करा,पण शेतकरी जगवा ,जनावरांना जगवा ,प्रजेला जगवा ,कुणाची हेळसांड करू नका .”
     प्रजेच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याची कामे काढली,रस्त्याच्या कामावर येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळण्यासाठी  शिशु संगोपन गृह सुरु केली.दुष्काळात  आपला प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा राजा महानच आहे .


समाजसेवक सेनापती बापट

थोर समाजसेवक : सेनापती बापट

     गाडगे महाराजांचे नाव आपण सर्वांना माहीत आहे ते स्वच्छतेचे उपासक होते.हातात खराटा घेऊन अख्खा गाव झाडून लखलखीत करायचे.स्वच्छतेचे महत्व समजावून सांगायचे.त्यांच्या सारखेच एक समाजसेवक-सेनापती बापट . सकाळी लवकर उठून ,दैनंदिन कामे उरकून ,हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात करायची.सफाई करणे सोपे असते,पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते ,असे त्यांना वाटे.
        गावातील लोक त्यांना तात्या म्हणून ओळखायचे.त्यांचे सफाईचे काम पाहून एक जण विचारला ."तात्या ,हे कसले काम काढले आहे"?तात्या म्हणाले "स्वच्छतेचं".त्यावर गावकरी म्हणले ,"तुमच्या सारख्या शिकलेल्या माणसांनी असले काम करणं शोभत नाही."काम हे काम असते . जगामध्ये कोणतेही काम हलके नसते.तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा.
       गावकर्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली नि सारी हकीकत सांगितली .एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले ,तू झाडू घेऊन सफाई ला सुरुवात केलीस! आयुष्यात काय करायचं ते ठरवलंस की नाही ?
सार आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं, अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे ."सफाई करण्यात कसलीदेशसेवा?"दादांनी विचारले .
       "दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करताना देवाची खोली व बैठक स्वच्छ करता ना?मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवची बैठक झाडून स्वच्छ करतो.
"तुम्ही पूजक देवाचे । देशाचा मी ही पूजक।।
सर्वव्यापी देव माझा । त्याची मी झाडी बैठक ।।
यावर दादा तरी काय बोलणार ? सेनापती बापट यांनी हे व्रत आयुष्यभर राबवले.

Sunday, 22 October 2017

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज :

जयपूर कडील एक राजा शिकारीसाठी ताडोबा अरण्यात आला होता. त्या जंगलात एका गुहेच्या मुखाजवळ एक लहान मुलगा ध्यानास बसला होता.राजाने त्या मुलास जंगलातील प्राण्याविषयी विचारले.तो लहान मुलगा राजाला म्हणाला ,”हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत.तुम्ही त्यांना का हो मारता ?”त्यानंतर राजाला काय बोलावे हे कळेना ?तो विचार करू लागला.त्याला स्वत:ची चूक समजली .त्या राजाने शपथ घेतली ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही ‘ज्या मुलाने राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्य मुलाचे नाव होते- माणिक .म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

    मानिकच्या वडिलाचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा.तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आजोळी वरखेडला नेले.तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले.त्या महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले .तुकडोजीने त्यांना आपले गुरू मानले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत १९३० सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे.त्यावेळी तुकडोजी महाराजांनी सत्याग्रही तरुणाच्या गोटात जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मानत स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. महात्मा गांधीजीनी छोडो भारत ची घोषणा केली.गांधीजींच्या या चळवळीत आपल्या अनुयायासह सहभागी झाले.त्यावेळी त्यांना तुरंगवासही झाला होता .
   १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य चालू होते. या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने कोल्हापूर संस्थान आणि हैद्राबाद संस्थान विलीन करणात सहभाग घेतला.

    श्री गुरुदेव सेवामंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताहाचे आयोजन करत असे.त्याद्वारे स्वच्छता, व्यसनमुक्ती ,आरोग्य आणि ग्रामोद्योग असे उपक्रम राबवले .महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वाना सहभागी करून सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या मंदिरात सर्वाना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजीनी उपोषण केले मात्र तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले .

    आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरु केली .महाराजांनी त्या चळवळीत भाग घेऊन भूमिहीनांना जमीन मिळवून दिली.त्यांचे हे कार्य पाहून डौ. राजेंद्रप्रसाद यानी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करून राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला.

पुढे जपानमध्ये जागतिक धर्मपरिषद आणि विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यांच्या उद्घाटनकरिता महाराजांना निमंत्रित केले .या परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन परिषदेचे उद्घाटन केले .अशा विविध उपक्रमात गुंतले असताना त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहेत. ग्रामगीता हा साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय.तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवामंडळानी चालू ठेवले आहे .       

Friday, 20 October 2017

School activity of students | Sleeping yoga pose

 Yoga Sleeping poses by students

 हा विडीओ जि .प .दहिवली नं १ ता .खेड (रत्नागिरी )या शाळेतील विध्यार्थानी सादर केलेला आहे .या विडीओमध्ये विपरीत शयनस्थितीतील आसने आहेत.
  


                             click here for video

सदर व्हिडिओ मध्ये भुजंगासन, शलभासन,धनुरासन या आसनांचा समावेश केला आहे.School Activity of students या विषयांतर्गत असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील.



Facebook page = www.facebook.com/nitin.salagare93
Twitter = twitter.com/nitin salagare

Friday, 13 October 2017

1) School activity of students in the form of Yogasanas


This is a School activity of students in the form of Yogasanas

SCHOOL ACTIVITY OF STUDENTS

                       click here  for video

      हा व्हिडीओ आमच्या जि.प.केंद्रीय शाळा दहिवली नं १ ता.खेड जि. रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे.
     सदर व्हिडीओ हा योगासनातील दंडस्थितीतील (standing pose) या स्थिती तील असून यामध्ये वृक्षासन ,त्रिकोणासन,तारासन,ताडासन आणि पादहस्तासन या आसनांचा समावेश केला गेला आहे
  असे अनेक शैक्षणिक व्हिडीओ School Activity of students या विषयांतर्गत नियमित दर शनिवारी एक व्हिडिओ  अपलोड केला जाणार आहे.

If you like this video share to all.

Tuesday, 8 August 2017

Yog Mudra



योगमुद्रा

मुद्रा या शब्दाचे अर्थ बरेच आहेत.हठयोगात मुद्रा म्हणजे कुंडलिनी जागृती करताना सांगितलेल्या आसन सुदृश्य प्रक्रिया आहेत.हाताच्या विशिष्ट स्थिती अशा संदर्भातच मुद्रा हा शब्द वापरला आहे. खाली विविध मुद्राची माहिती नावसाहित दिली आहे .

१) षण्मुखी मुद्रा :--

चेहऱ्यावरील सहा मुखे बोटाच्या मदतीने बंद करण्याची प्रक्रिया असल्याने यास षण्मुखी मुद्रा म्हटले जाते.

Yoga

ब्रम्हमुद्रेप्रमाणे सहा दिशांना तोंड वाकवणे यात अपेक्षित नाही.

या मुद्रेची कृती :

ही मुद्रा पद्मासन, सिद्धासन ,स्वस्तिकासन किंवा वज्रासन अशा कोणत्याही आसनात बसून करता येते.
१) श्वास घेऊन ( पूरक करून ) ,डाव्या हाताचा अंगठा डाव्या कानामध्ये आणि उजव्या हाताचा अंगठा उजव्या कानामध्ये ठेवा.
२) डाव्या हाताची तर्जनी डावा डोळा बंद करून आणि उजव्या हाताची तर्जनी उजवा डोळा बंद करून पापणीवर ठेवा.
३) डाव्या हाताचे मधले बोट डाव्या नाकपुडीवर आणि उजव्या हाताचे मधले बोट उजव्या नाकपुडीवर दाबून ठेवा.
४) डाव्या हाताची अनामिका व करंगळी आणि उजव्या हाताची अनामिका व करंगळी  तोंड बंद करून ओठावर ठेवा.
५)श्वास रोखुन धरा ( कुंभक ) आतून हवेचा दाब  द्या.
 ६) दाब सहन होई पर्यंत कुंभक करा आणि नंतर श्वास सावकाश सोडून द्या ( रेचक करा) .

या मुद्रेमुळे होणारे फायदे  :-

१)आत निर्माण होणाऱ्या दाबामुळे अनेक चांगले परिणाम जाणवतात.
२) कान, डोळा घसा आणि  मेंदू  यांच्या कार्यावर अनुकूल परिणाम होऊन त्यांचे कार्य सुधारते.

घ्यायची दक्षता:-

चेहऱ्यावरचा एखादा दुबळा अवयव असेल, एखाद्या अवयवाची शस्त्रक्रिया झाली असेल तर तज्ञांच्या सल्ल्याने कृती करा.

२)ज्ञान मुद्रा

या मुद्राची कृती :-

१) पद्मासन ,सिद्धासन घालून बसा.
२) तळहात शिथिल करून हाताची मनगटे गुडघ्यावर ठेवा.
Yoga

३) हाताची तर्जनी आणि अंगठा पकडून ,त्यांचा आकार वर्तुळासारखा दिसेल आणि इतर बोटे किंचित वाकलेले असतील असे ठेवा.

३) द्रोणमुद्रा:-

१) पद्मासनात किंवा वज्रासनात बसा.
२)  हाताची स्थिती द्रोणाप्रमाणे खोलगट करून, खालच्या दिशेने करुन हात गुडघ्यावर ठेवा.
Yoga


३)डोळे बंद करा आणि ताठ बसा.

४) ब्रम्हमुद्रा :-

 ब्रम्हमुद्रा ही मानेच्या हालचालींसाठी ,व्यायामासाठी आहे.वरील तिन्ही प्रकार या हाताच्या संबधित होत्या,मात्र ही मुद्रा मानेच्या संबंधित आहे.
पुढे,मागे, डावीकडे आणि उजवीकडे अशा चार दिशांनी मानेची हालचाल करावी लागते.

Yoga

ब्राम्हदेवास चार तोंड असल्याने या मुद्रास ब्रम्हमुद्रा असे नाव पडले आहे.

या मुद्रेची कृती :-

१) स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसा.
२) प्रथम मान पुढे गळ्याचा खोबणीत ठेवा आणि पुढील बाजूस ताणा.
३) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या
४)आता मान मागील बाजूस वाकवून ,तोंड बंद करून ताण द्या
५) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.
६) आता मान डाव्या बाजूला झुकवून खांद्याला स्पर्श करा ,मात्र खांदा वर उचलू नका.
७) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.
८)मान उजव्या बाजूला झुकवून खांद्याला  स्पर्श करा ,मात्र खांदा उचलू नका.
९) डोके सावकाश उचलून पूर्वस्थितीत या.

घ्यायची दक्षता:-

ज्या व्यक्तिस मानेचा स्पाँडीलायटीस झाला असेल त्यांनी मान पुढे न ताणता मागील बाजूस ताणा. मात्र जास्त ताण देऊ नका.

५)पद्ममुद्रा:-

ज्ञानमुद्रा,द्रोणमुद्राऐवजी हाताची आणखी एक सोपी मुद्रा ती म्हणजे पद्ममुद्रा. यात हाताची बोटे एकमेकात गुंफवून ,डाव्या हाताचा पंजा नाभीखाली ठेवा आणि त्यावर उजव्या हाताचा पंजा ठेवा.
पद्मासनात  ही मुद्रा केल्यास दोन्ही पायांचे  तळवे व त्यावर दोन्ही हाताचे पंजे कमलाच्या पाकळ्याप्रमाणे  दिसतात.
धारणा ,ध्यान यांच्या अभ्यासाकरिता या मुद्रेची स्थिती उपयोगी पडते.


६) सिंहमुद्रा:-

ही मुद्रा चेहऱ्याच्या स्थितीच्या संबंधित आहे.

Yoga

या मुद्रेचा सिंहाशी प्रत्यक्ष संबंध नसला तरी सिंह जेंव्हा भक्ष्यावर हल्ला करण्याकरता किंवा डरकाळी फोडण्याकरिता भयानक तोंड उघडते व जीभ लांब बाहेर काढतो त्यावेळी त्याचा चेहरा या मुद्रेत अपेक्षित आहे.

या मुद्रेची कृती: /

१)पद्मासन ,स्वस्तिकसन सिद्धासन यापैकी एका आसनात बसून हाताची द्रोणमुद्रा करा.
२)हाताने गुढघ्यावर किंचित दाब द्या.
३)मान सरळ करून तोंड जास्तीत जास्त उघडे करा.जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून हनुवटीच्या दिशेने खाली गोलाकार वळवा.
४)भुवया वरच्या दिशेने ताणून घ्या.
या मुद्रेने चेहऱ्यावरील सर्व स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो .स्नायू थकले की ताण कमी करा.

या मुद्रेमुळे होणारे फायदे:-

१) चेहऱ्यावरील स्नायू ताणले गेल्याने त्यांचा रक्तप्रवाह सुधारतो.
२) अभिनय करणाऱ्यांना या मुद्रेचा चांगला फायदा होतो.
३) थायरॉईड टॉन्सिल्स सारखे विकार कमी मदत होते.
४)आवाजाची प्रत सुधारते आणि सौंदर्य वाढीस लागते.

घ्यायची दक्षता :-

घशाचा त्रास वेदना  सूज असल्यास ही मुद्रा करू नये..



_____;_____;_____;_______________________

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...