डॉ बाबासाहेब
आंबेडकर
जन्म १४ एप्रिल १८९१
महु ,इंदौर (मध्यप्रदेश)
शिक्षण:M.A. Ph.D
,M.Sc.,D.Sc.,Ll.D.D.Lit. असे
एकूण ३२ पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.
जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे
पंडित ,लेखक ,समाजसुधारक तत्वज्ञ ,भारतीय संविधानाचे शिल्पकार ,मानवी हक्काचे
कैवारी ,स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री होते.याशिवाय डॉ आंबेडकर हे
समाजशास्त्रज्ञ ,मानववंशशास्त्रज्ञ ,इतिहासकार ,शिक्षणतज्ञ ,धर्मशास्त्रज्ञ
,प्राध्यापक,barister ,वक्ते,पत्रकार ,जलतज्ञ, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी
,मजूर मंत्री आणि भारतातील कोट्यावधी शोषित दलितांचे उद्धारक सुद्धा होते .
त्या काळी दलितांना
आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी घातली होती ,तेंव्हा बाबासाहेब शाळेच्या बाहेर
थांबून,ऐकून शिक्षण पूर्ण केले. खडतर हाल
अपेष्टा सहन करीत ,प्रसंगी उपाशी राहून त्यांनी विविध विषयात पदवी मिळवून देशाची
सेवा केली.
२०१२ साली सर्वात
महान भारतीय या आन्तार्राष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान
भारतीय म्हणून डॉ .बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झाले आहे .कोलंबिया विद्यापीठाने
जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार केली त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगात नंबर १ महाविद्वान म्हणून गौरव करण्यात आला .
प्रचंड कुशाग्र
बुद्धिमत्ता ,तल्लख स्मरणशक्ती ,प्रगाध विद्वता असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील तब्बल ६४ विषयावर प्रभुत्व होते .एवढ्या साऱ्या
विषयावर प्रभुत्व असणारे बाबासाहेब जगातील
इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत ,असे इंग्लंडच्या केम्ब्रिज
विद्यापिठ्ने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात
बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे .
जातीव्यवस्थेविरुद्ध
प्रखर संघर्ष ,महान भारतीय संविधानाचे निर्माते अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी भारत
सरकारने भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले .
दलित, शोषित,मजूर
आणि स्त्रियांच्या हितासाठी ,कल्याणासाठी खालील संघटना स्थापन करून
दलितांचा,शोषितांचा ,मजुरांचा आणि स्त्रियांचा विकास घडवून आणला
१)बहिष्कृत
हितकारिणी सभा २)समता सैनिक दल ३)अनुसूचित जाती फेडरेशन
४)डिप्रेस क्लास
एजुकेशन सोसायटी ५)पीपल्स इजुकेषण सोसायटी
६ )स्वतंत्र लेबर पार्टी
७ ) भारतीय बौद्ध
महासभा