कोल्हापुरातील घटना :
कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या,उन्हाचा तडाखा बसू लागला.प्रजेच्या
डोळ्यातील पाणी आटू लागल .शेतकरी आभाळाकडे टक लावून बघू लागला.कारण १८९६ सालचा
पावसाळा कोरडा गेला होता.
महाराष्ट्रभर
दुष्काळाने थैमान घातले होते.माणसे आणि जनावरांची उपासमार होऊ लागली.लोक गाव
सोडून जाऊ लागली.शाहू महाराजांचा जीव खाली वर होऊ लागला.त्यांनी दिवान बहाद्दूर
रघुनाथराव सबनीसाना आणि निवडक अधिकाऱ्यांना बोलावून घोड्यावरून राज्याची पाहणी
करण्यासाठी निघाले.गडहिंग्लाज ,भुदरगड ,पान्हळा शाहुवाडी या तालुक्यांची पाहणी
केली असता हिरवीगार रान करपून गेली होती .महाराज स्वत: जनतेला धीर देत
होते. उन्हातान्हाचा मारा सहन करीत महाराज भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होत होत .
महाराजांनी
व्यापायांची बैठक बोलावून घेतली.परिस्थितीची माहिती दिली त्यांना अये सांगितले कि
जर तुम्ही धान्याचा किमती कमी केल्या तर गरीब रयतेला विकत घ्यायला
परवडेल.खरेदीच्या दारात प्रजेला धन्य मिळाले त्र्प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि
तुमचे नुकसान होऊ देणार नाही.तुमचा तोटा दरबारातून भरून देऊ .त्यामुळे धान्याच्य
किमती उतरल्या.प्रजेला रास्त दारात धान्य घ्यायला परवडायला लागलं.
पाण्याचा प्रश्न:
महाराजांनी पाण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या. ‘विहिरीतला गाळ काढा
,नदीकाठी विहीरी खोदा.दरबारातून लागेल तेवढा खर्च करा.’ असा आदेश दिला.विहिरीच्या गाळ काढल्याने त्यांची लांबी ,रुंदी आणि खोली वाढल्याने पाणी साठायला
लागलं.जनतेसाठी ,जनावरांसाठी पाण्याची सोय झाली.
जनावरांसाठी
चाऱ्याची सोय व्हावी म्हणून छावण्या उभ्या केल्या .त्यांना वैरण ,दाणागोटा
देण्याची सोय केली.यावेळी जनावरांची उपासमार थांबली.महाराजांनी हुकुम
दिला, “सगळा खजिना रिकामा करा,पण शेतकरी जगवा ,जनावरांना जगवा ,प्रजेला जगवा
,कुणाची हेळसांड करू नका .”
प्रजेच्या हाताला काम
मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याची कामे काढली,रस्त्याच्या कामावर
येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळण्यासाठी
शिशु संगोपन गृह सुरु केली.दुष्काळात
आपला प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा राजा महानच आहे .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.