राष्ट्रसंत तुकडोजी
महाराज :
जयपूर कडील एक राजा शिकारीसाठी ताडोबा अरण्यात आला होता. त्या जंगलात एका गुहेच्या
मुखाजवळ एक लहान मुलगा ध्यानास बसला होता.राजाने त्या मुलास जंगलातील
प्राण्याविषयी विचारले.तो लहान मुलगा राजाला म्हणाला ,”हे सुखी जीव आनंदाने जंगलात
नांदत आहेत.तुम्ही त्यांना का हो मारता ?”त्यानंतर राजाला काय
बोलावे हे कळेना ?तो विचार करू लागला.त्याला स्वत:ची चूक समजली .त्या राजाने शपथ
घेतली ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही ‘ज्या मुलाने राजाला
अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्य मुलाचे नाव होते- माणिक .म्हणजेच राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज !
मानिकच्या वडिलाचे
नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा.तो लहान असताना त्याच्या आईने त्याला
आजोळी वरखेडला नेले.तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले.त्या
महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले .तुकडोजीने त्यांना आपले गुरू मानले.
भारतीय स्वातंत्र्य
चळवळीत १९३० सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे.त्यावेळी तुकडोजी महाराजांनी
सत्याग्रही तरुणाच्या गोटात जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मानत स्वराज्य
मिळवण्याची प्रेरणा जागवली. महात्मा गांधीजीनी छोडो भारत ची घोषणा
केली.गांधीजींच्या या चळवळीत आपल्या अनुयायासह सहभागी झाले.त्यावेळी त्यांना
तुरंगवासही झाला होता .
१९४७ च्या
स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य चालू
होते. या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने कोल्हापूर संस्थान आणि
हैद्राबाद संस्थान विलीन करणात सहभाग घेतला.
श्री गुरुदेव
सेवामंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताहाचे आयोजन करत असे.त्याद्वारे स्वच्छता,
व्यसनमुक्ती ,आरोग्य आणि ग्रामोद्योग असे उपक्रम राबवले .महाराजांनी सामुदायिक
सहभोजनात सर्वाना सहभागी करून सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला.
पंढरपूरच्या मंदिरात सर्वाना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजीनी उपोषण केले मात्र
तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले
.
आचार्य विनोबा भावे
यांनी भूदान चळवळ सुरु केली .महाराजांनी त्या चळवळीत भाग घेऊन भूमिहीनांना जमीन
मिळवून दिली.त्यांचे हे कार्य पाहून डौ. राजेंद्रप्रसाद यानी संत तुकडोजी
महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करून राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव
केला.
पुढे जपानमध्ये
जागतिक धर्मपरिषद आणि विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यांच्या
उद्घाटनकरिता महाराजांना निमंत्रित केले .या परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील
तत्वांची माहिती देऊन परिषदेचे उद्घाटन केले .अशा विविध उपक्रमात गुंतले असताना त्यांनी
अनेक पुस्तकांचे लेखन केले आहेत. ग्रामगीता हा साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी
होय.तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवामंडळानी चालू ठेवले आहे .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.