संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे एका गरिब कुटुंबात इ.स.
१८७६ साली झाला. आई बापानी त्यांचे नाव डेबू ठेवले .
स्वतःच्या आयुष्यात आलेल्या खडतर जीवनाचा अनुभव इतरांच्या आयुष्यात येऊ नये यासाठी समाजात आयुष्यभर उपदेश करणारे गाडगे बाबा स्वच्छतेचे आग्रही होते.लहानपणापासून त्यांनी निरीक्षण करुन आपल्या आजूबाजूचे दु:ख, दैन्य, दारिद्रय यांचा सखोल अभ्यास केला. डोक्यावर शुभ्र रंग केस,पिंगट डोळे,गोरा रंग,अंगात फाटका पण स्वच्छ सदरा जाडजूड, धिप्पाड देह हातात एक काठी अन एक गाडगे.त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचे म्हणून त्यांना गाडगे महाराज म्हणत.
पुढे जीवनभर समाजातील घाण कचरा काढून ,अस्वच्छ परिसर स्वच्छ करून पोट भरले
व इतर वेळेत समाजाला शहाणे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सर्वसामान्य समाज कर्जबाजारी बनला होता. अशा काळात लोकांना
शिकून सवरून शहाणे व्हा ,कर्ज काढून नका, प्राणीमात्रावर दया करा, अशा
प्रकारचा उपदेश करीत.लोकांना प्रथम प्रश्न विचारून त्याचे उतर लोकांनाच सांगण्यास
सांगत.त्यांची चूक लक्षात आणून देत व त्यातून मार्ग कसा काढायाचा यावर मार्मिक
उत्तर देत.त्यांनी समाजात वाईट चालीरीती बंद करणासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केली.
महारष्ट्रातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी बाबा स्वतः राबून ,मदत मागून
धर्मशाळा बांधल्या. काही नद्यावर घाट बांधले ,पाणपोया उघडल्या. गरीब ,अनाथ आणि अपंगासाठी
सदावर्ते सुरु केली . मुलांसाठी शाळा ,महाविद्यालये आणि वसतिगृहे उभी केली.
ज्या ठिकाणी दु:ख दिसले त्याठिकाणी बाबा हजार होत .रंजल्या गंजल्या लोकांची सेवा
हीच बाबांची देवपूजा म्हणूनच लोक त्यांना
आदरानी गाडगे बाबा म्हणत .
No comments:
Post a Comment
leave your response.
तुम्हाला आजची पोस्ट कशी वाटली ?जर पोस्ट आवडली तर comments करा.. तुम्ही माझ्या ब्लोगला भेट दिलात ते माझ्यासाठी पुष्कळ आहे.