https://nitinsalagare.blogspot.in या शैक्षणिक ब्लॉगवर तुमचे मनापासून स्वागत!
.

Sunday, 29 October 2017

संत तुकारामांची मराठीत माहिती

      संत तुकाराम हे इ.स.च्या 16 व्या शतकातील ,शिवाजी महाराजांच्या काळातील एक लोकप्रिय संत.पंढतपुरचा विट्ठल हा तुकारामाचा आराध्य देव .तुकारामांना वारकरी जगदगुरु म्हणून ओळखतात. वारकरी सांप्रदाय किर्तनाच्या शेवटी-पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ,श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ,जगद्गुरू तुकाराम महाराज की जय असा जयघोष करतात.
मूळ नाव:- तुकाराम बोल्होबा अंबिले ,गुरू:-केशवचैतन्य ओतूर
शिष्य :- निळोबा संत,संत बहिणाबाई
     तुकाराम महाराज हे साक्षात्कारी ,निर्भीड असे संत कवी होते.उशिष्ठ वर्गाची मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवणीतून सामान्य माणसापर्यंत पोहचवला.वारकरी,साहित्यिक ,अभयासक आणि सामान्य रसिक आजही त्यांचा अभंगाचा अभ्यास करतात .त्यांचे अभंग अशिक्षित लोकांना पाठांतर आहेत.
       भागवत धर्माचा कळस होण्याचे भाग्य त्यांना लाभले.महाराष्ट्रातील लोकांच्या हृदयात अभंग रूपाने स्थिरावले आहेत.मंत्र्यांचे पावित्र्य यांच्या शब्दकलेत पाझरते.त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय आहे.
तुकारामांनी तुकाराम गाथा या ग्रंथात अनेक अभंगाचे लेखन केले आहे.त्यातील बरेच अभंग लोकांच्या तोंडी पाठ आहेत.
     चित्रपट:- इ.स.1936 मध्ये प्रभात फिल्म कंपनीच्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत संत तुकाराम या नावाने चित्रपट बनवला.

Saturday, 28 October 2017

डॉ बाबासाहेब आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर
    जन्म १४ एप्रिल १८९१ महु ,इंदौर  (मध्यप्रदेश)
    शिक्षण:M.A. Ph.D ,M.Sc.,D.Sc.,Ll.D.D.Lit. असे एकूण ३२ पदव्या त्यांनी मिळवल्या आहेत.
  
      जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ,कायदे पंडित ,लेखक ,समाजसुधारक तत्वज्ञ ,भारतीय संविधानाचे शिल्पकार ,मानवी हक्काचे कैवारी ,स्वातंत्र्य भारताचे पहिले कायदामंत्री होते.याशिवाय डॉ आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ ,मानववंशशास्त्रज्ञ ,इतिहासकार ,शिक्षणतज्ञ ,धर्मशास्त्रज्ञ ,प्राध्यापक,barister ,वक्ते,पत्रकार ,जलतज्ञ, स्त्रियांच्या हक्कांचे कैवारी ,मजूर मंत्री आणि भारतातील कोट्यावधी शोषित दलितांचे उद्धारक सुद्धा होते .
त्या काळी दलितांना आणि स्त्रियांना शिक्षण घेण्यास बंदी घातली होती ,तेंव्हा बाबासाहेब शाळेच्या बाहेर थांबून,ऐकून  शिक्षण पूर्ण केले. खडतर हाल अपेष्टा सहन करीत ,प्रसंगी उपाशी राहून त्यांनी विविध विषयात पदवी मिळवून देशाची सेवा केली.   

       २०१२ साली सर्वात महान भारतीय या आन्तार्राष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर  सर्वात महान भारतीय म्हणून डॉ .बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झाले आहे .कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार केली त्यात  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगात नंबर १ महाविद्वान म्हणून गौरव करण्यात आला .
प्रचंड कुशाग्र बुद्धिमत्ता ,तल्लख स्मरणशक्ती ,प्रगाध  विद्वता असलेले बहुआयामी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ज्ञानक्षेत्रातील  तब्बल ६४ विषयावर प्रभुत्व होते .एवढ्या साऱ्या विषयावर प्रभुत्व असणारे बाबासाहेब जगातील  इतिहासातील ते प्रथम व एकमेव व्यक्ती आहेत ,असे इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापिठ्ने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे .

     जातीव्यवस्थेविरुद्ध प्रखर संघर्ष ,महान भारतीय संविधानाचे निर्माते अशा अनेक अतुलनीय देशसेवेसाठी भारत सरकारने भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले .
दलित, शोषित,मजूर आणि स्त्रियांच्या हितासाठी ,कल्याणासाठी खालील संघटना स्थापन करून दलितांचा,शोषितांचा ,मजुरांचा आणि स्त्रियांचा विकास घडवून आणला
१)बहिष्कृत हितकारिणी सभा  २)समता सैनिक दल  ३)अनुसूचित जाती फेडरेशन
४)डिप्रेस क्लास एजुकेशन सोसायटी  ५)पीपल्स इजुकेषण सोसायटी ६ )स्वतंत्र लेबर पार्टी

७ ) भारतीय बौद्ध महासभा 

Thursday, 26 October 2017

Sunsalutation |

सूर्यनमस्कार
        ही भारतीय प्राचीन व्यायाम पद्धती आहे.भगवान सुर्यनारायनाला अष्टांगांनी केलेला नमस्कार होय.प्रातःकाळी पूर्व दिशेला तोंड करून ,सुर्यनारायणाची स्तुती करत सूर्यनमस्कार घालण्याची परंपरा आहे. 
       संपूर्ण विश्वाला ऊर्जा व प्रकाश देणाऱ्या,ऋतूंची निर्मिती करणाऱ्या आणि  अन्न निर्माण करणाऱ्या सूर्याला नमस्कार केल्याने सकाळच्या कोवळ्या किरणांचा शरीराला लाभ होतो .सूर्यनमस्कारामुळे शारीरिक व्यायाम होतो त्याचप्रमाणे विचाराना उत्तेजन मिळते. उगवत्या सूर्याच्या समोर हा व्यायाम केल्याने ,सूर्याच्या किरणाद्वारा जीवनसत्व डी भरपूर प्रमाणात शरीरास मिळते.
सूर्यनमस्कारामध्ये एकूण बारा अवस्था आहेत.या प्रत्येक अवस्थाने शरीराच्या प्रत्येक अवयवास व्यायाम मिळतो.या बारा अवस्थांचा मिळून एक सूर्यनमस्कार होते आणि पंचवीस नमस्काराचे एक आवर्तन होते.
         प्रत्येक अवस्थांची चित्रासह माहिती पुढे दिली आहे.प्रत्येक अवस्थेपासून मिळणाऱ्या फायद्याची माहितीही दिली आहे.सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी प्रथम प्रार्थना म्हणावी आणि प्रत्येक नमस्काराबरोबर सूर्याचे एकेक नाव उच्चारून नमस्कार घालावा.

१) ओम मित्राय नमः 
२) ओम रवये नमः 
३)ओम सूर्याये  नमः
४)ओम  भानवे नमः । 
५)ओम खगाय नमः।    
 ६)ओम पुष्णे नमः। 
७)ओम हिरण्यगर्भय नमः।
८)ओम मरीचये नमः। 
९) ओम आदित्याय नमः
१०) ओम सवित्रे नमः।                       
School Activity of students
११)ओम अर्काय नमः ।
 १२) ओम भास्करा य  नम :                     
                                     Forvideo Click here

Monday, 23 October 2017

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

     कोल्हापुरातील घटना : कोल्हापूरच्या सुपीक जमिनीला भेगा पडू लागल्या,उन्हाचा तडाखा बसू लागला.प्रजेच्या डोळ्यातील पाणी आटू लागल .शेतकरी आभाळाकडे टक लावून बघू लागला.कारण १८९६ सालचा पावसाळा कोरडा गेला होता.
     महाराष्ट्रभर दुष्काळाने थैमान घातले होते.माणसे आणि जनावरांची उपासमार होऊ लागली.लोक गाव सोडून जाऊ लागली.शाहू महाराजांचा जीव खाली वर होऊ लागला.त्यांनी दिवान बहाद्दूर रघुनाथराव सबनीसाना आणि निवडक अधिकाऱ्यांना बोलावून घोड्यावरून राज्याची पाहणी करण्यासाठी निघाले.गडहिंग्लाज ,भुदरगड ,पान्हळा शाहुवाडी या तालुक्यांची पाहणी केली असता हिरवीगार रान करपून गेली होती .महाराज स्वत: जनतेला धीर देत होते. उन्हातान्हाचा मारा सहन करीत महाराज भेटायला येत असल्याचं प्रजेला अप्रूप होत होत .
     महाराजांनी व्यापायांची बैठक बोलावून घेतली.परिस्थितीची माहिती दिली त्यांना अये सांगितले कि जर तुम्ही धान्याचा किमती कमी केल्या तर गरीब रयतेला विकत घ्यायला परवडेल.खरेदीच्या दारात प्रजेला धन्य मिळाले त्र्प्रजा तुम्हाला दुवा देईल आणि तुमचे नुकसान होऊ देणार नाही.तुमचा तोटा दरबारातून भरून देऊ .त्यामुळे धान्याच्य किमती उतरल्या.प्रजेला रास्त दारात धान्य घ्यायला परवडायला लागलं.
     पाण्याचा प्रश्न: महाराजांनी पाण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरु केल्या. ‘विहिरीतला गाळ  काढा ,नदीकाठी विहीरी खोदा.दरबारातून लागेल तेवढा खर्च करा.’ असा आदेश दिला.विहिरीच्या गाळ  काढल्याने त्यांची लांबी ,रुंदी आणि खोली वाढल्याने पाणी साठायला लागलं.जनतेसाठी ,जनावरांसाठी पाण्याची सोय झाली.
     जनावरांसाठी चाऱ्याची सोय व्हावी म्हणून छावण्या उभ्या केल्या .त्यांना वैरण ,दाणागोटा देण्याची सोय केली.यावेळी जनावरांची उपासमार थांबली.महाराजांनी हुकुम दिला, “सगळा खजिना रिकामा करा,पण शेतकरी जगवा ,जनावरांना जगवा ,प्रजेला जगवा ,कुणाची हेळसांड करू नका .”
     प्रजेच्या हाताला काम मिळावे म्हणून रोजगार हमी योजनेंतर्गत रस्त्याची कामे काढली,रस्त्याच्या कामावर येणाऱ्या बायकांच्या मुलांना सांभाळण्यासाठी  शिशु संगोपन गृह सुरु केली.दुष्काळात  आपला प्रजेला पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळणारा राजा महानच आहे .


समाजसेवक सेनापती बापट

थोर समाजसेवक : सेनापती बापट

     गाडगे महाराजांचे नाव आपण सर्वांना माहीत आहे ते स्वच्छतेचे उपासक होते.हातात खराटा घेऊन अख्खा गाव झाडून लखलखीत करायचे.स्वच्छतेचे महत्व समजावून सांगायचे.त्यांच्या सारखेच एक समाजसेवक-सेनापती बापट . सकाळी लवकर उठून ,दैनंदिन कामे उरकून ,हातात झाडू घेऊन सफाईला सुरुवात करायची.सफाई करणे सोपे असते,पण लोकांच्या वृत्तीत बदल घडवून आणणे अवघड असते ,असे त्यांना वाटे.
        गावातील लोक त्यांना तात्या म्हणून ओळखायचे.त्यांचे सफाईचे काम पाहून एक जण विचारला ."तात्या ,हे कसले काम काढले आहे"?तात्या म्हणाले "स्वच्छतेचं".त्यावर गावकरी म्हणले ,"तुमच्या सारख्या शिकलेल्या माणसांनी असले काम करणं शोभत नाही."काम हे काम असते . जगामध्ये कोणतेही काम हलके नसते.तुम्हीही या स्वच्छता मोहिमेत सामील व्हा.
       गावकर्यांनी तात्यांच्या वडिलांची म्हणजे दादांची भेट घेतली नि सारी हकीकत सांगितली .एके दिवशी दादा तात्यांना म्हणाले ,तू झाडू घेऊन सफाई ला सुरुवात केलीस! आयुष्यात काय करायचं ते ठरवलंस की नाही ?
सार आयुष्य देशसेवेसाठी घालवायचं, अशी मी प्रतिज्ञा घेतली आहे ."सफाई करण्यात कसलीदेशसेवा?"दादांनी विचारले .
       "दादा, तुम्ही रोज देवाची पूजा करताना देवाची खोली व बैठक स्वच्छ करता ना?मग देश हाच माझा देव. मी माझ्या देवची बैठक झाडून स्वच्छ करतो.
"तुम्ही पूजक देवाचे । देशाचा मी ही पूजक।।
सर्वव्यापी देव माझा । त्याची मी झाडी बैठक ।।
यावर दादा तरी काय बोलणार ? सेनापती बापट यांनी हे व्रत आयुष्यभर राबवले.

Sunday, 22 October 2017

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज :

जयपूर कडील एक राजा शिकारीसाठी ताडोबा अरण्यात आला होता. त्या जंगलात एका गुहेच्या मुखाजवळ एक लहान मुलगा ध्यानास बसला होता.राजाने त्या मुलास जंगलातील प्राण्याविषयी विचारले.तो लहान मुलगा राजाला म्हणाला ,”हे सुखी जीव आनंदाने जंगलात नांदत आहेत.तुम्ही त्यांना का हो मारता ?”त्यानंतर राजाला काय बोलावे हे कळेना ?तो विचार करू लागला.त्याला स्वत:ची चूक समजली .त्या राजाने शपथ घेतली ‘यापुढे मी कोणत्याही प्राण्याची शिकार करणार नाही ‘ज्या मुलाने राजाला अहिंसेची शपथ घ्यायला लावली त्य मुलाचे नाव होते- माणिक .म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज !

    मानिकच्या वडिलाचे नाव बंडोजी इंगळे ठाकूर आणि आईचे नाव मंजुळा.तो लहान असताना त्याच्या आईने त्याला आजोळी वरखेडला नेले.तिने त्याला आडकोजी महाराजांच्या सानिध्यात ठेवले.त्या महाराजांनी त्याला तुकड्या हे नाव दिले .तुकडोजीने त्यांना आपले गुरू मानले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत १९३० सालचा जंगल सत्याग्रह प्रसिद्ध आहे.त्यावेळी तुकडोजी महाराजांनी सत्याग्रही तरुणाच्या गोटात जाऊन खंजिरी भजनाद्वारे त्यांच्या मानत स्वराज्य मिळवण्याची प्रेरणा जागवली. महात्मा गांधीजीनी छोडो भारत ची घोषणा केली.गांधीजींच्या या चळवळीत आपल्या अनुयायासह सहभागी झाले.त्यावेळी त्यांना तुरंगवासही झाला होता .
   १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर भारतीय प्रजासत्ताकात विविध संस्थाने विलीन करण्याचे कार्य चालू होते. या कार्यात तुकडोजींच्या श्री गुरुदेव सेवामंडळाने कोल्हापूर संस्थान आणि हैद्राबाद संस्थान विलीन करणात सहभाग घेतला.

    श्री गुरुदेव सेवामंडळ वेगवेगळ्या गावी सप्ताहाचे आयोजन करत असे.त्याद्वारे स्वच्छता, व्यसनमुक्ती ,आरोग्य आणि ग्रामोद्योग असे उपक्रम राबवले .महाराजांनी सामुदायिक सहभोजनात सर्वाना सहभागी करून सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरच्या मंदिरात सर्वाना प्रवेश मिळावा म्हणून सानेगुरुजीनी उपोषण केले मात्र तुकडोजी महाराजांनी अनेक लोकांच्या सह्या मिळवून त्या उपोषणाला समर्थन मिळवून दिले .

    आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरु केली .महाराजांनी त्या चळवळीत भाग घेऊन भूमिहीनांना जमीन मिळवून दिली.त्यांचे हे कार्य पाहून डौ. राजेंद्रप्रसाद यानी संत तुकडोजी महाराजांना राष्ट्रपती भवनात आमंत्रित करून राष्ट्रसंत या पदवीने त्यांचा गौरव केला.

पुढे जपानमध्ये जागतिक धर्मपरिषद आणि विश्वशांती परिषद आयोजित करण्यात आली होती.त्यांच्या उद्घाटनकरिता महाराजांना निमंत्रित केले .या परिषदेमध्ये भगवान बुद्धाच्या पंचशील तत्वांची माहिती देऊन परिषदेचे उद्घाटन केले .अशा विविध उपक्रमात गुंतले असताना त्यांनी अनेक पुस्तकांचे लेखन केले आहेत. ग्रामगीता हा साऱ्या पुस्तकांचा मुकुटमणी होय.तुकडोजी महाराजांचे कार्य पुढे अनेक सेवामंडळानी चालू ठेवले आहे .       

Friday, 20 October 2017

School activity of students | Sleeping yoga pose

 Yoga Sleeping poses by students

 हा विडीओ जि .प .दहिवली नं १ ता .खेड (रत्नागिरी )या शाळेतील विध्यार्थानी सादर केलेला आहे .या विडीओमध्ये विपरीत शयनस्थितीतील आसने आहेत.
  


                             click here for video

सदर व्हिडिओ मध्ये भुजंगासन, शलभासन,धनुरासन या आसनांचा समावेश केला आहे.School Activity of students या विषयांतर्गत असे अनेक व्हिडिओ पाहायला मिळतील.



Facebook page = www.facebook.com/nitin.salagare93
Twitter = twitter.com/nitin salagare

Friday, 13 October 2017

1) School activity of students in the form of Yogasanas


This is a School activity of students in the form of Yogasanas

SCHOOL ACTIVITY OF STUDENTS

                       click here  for video

      हा व्हिडीओ आमच्या जि.प.केंद्रीय शाळा दहिवली नं १ ता.खेड जि. रत्नागिरी या शाळेतील विद्यार्थ्यांनी सादर केला आहे.
     सदर व्हिडीओ हा योगासनातील दंडस्थितीतील (standing pose) या स्थिती तील असून यामध्ये वृक्षासन ,त्रिकोणासन,तारासन,ताडासन आणि पादहस्तासन या आसनांचा समावेश केला गेला आहे
  असे अनेक शैक्षणिक व्हिडीओ School Activity of students या विषयांतर्गत नियमित दर शनिवारी एक व्हिडिओ  अपलोड केला जाणार आहे.

If you like this video share to all.

Spoken English Training March 2018

We have completed training which is Spoken English training in Kalabani, Khed Ratnagiri.Our trainer are Mr.Prabhakar Kolekar &   In th...