विद्येविना मती गेली| मतीविना नीती गेली |
नीतिविना गती गेली | गतिविना वित्त गेले |
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले|
-- महात्मा जोतीराव फुले
मराठी लेखक,नाटककार,विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि त्याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. पेशवांच्या काळामध्ये त्यांचे वडील आणि चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते,त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुणे ते फुले म्हणून ओळखू लागले आणि तेच नाव पुढे रूढ झाले.
जोतीराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .इ.स.१८४२ साली माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि बुद्धी तल्लख असल्याने पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
मानवी हक्कावर इ.स.1791 मध्ये थॉमस पेन यांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले.त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले.त्यामुळेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागास जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर भर दिला.सामाजिक भेदभाव शिक्षणामुळे दूर होईल असे त्यांचे ठाम मत आणि अनुमान होते.शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .समाजातील विषमता नष्ट करणे आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्याना शिक्षण पोहचवणे हे या सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज संस्थेचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते.वेदांना झुगारून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे जातीय भेद आणि स्पृश्य अस्पृश्य भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.सत्यशोधक समाज या संस्थांचे स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले.सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले.छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून आणि गुलामगिरीतून शुद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.या समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली आणि मराठीत मंगलाष्टके लिहिली.
सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवले जाते.महात्मा फुलें यांचे लेखन साहित्य
1) १८५५ साली तृतीय रत्न नाटक
२)१८८५ साली इशारा
३) १८६९ साली ब्राम्हणांचे कसब
४)१८९१ साली। सार्वजनिक सत्यधर्म
५)१८७३ साली गुलामगिरी
६)१८८३ साली शेतकऱ्यांचा आसूड
महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली
नीतिविना गती गेली | गतिविना वित्त गेले |
वित्ताविना शूद्र खचले | इतके अनर्थ एका अविद्येने केले|
-- महात्मा जोतीराव फुले
मराठी लेखक,नाटककार,विचारवंत आणि समाजसुधारक महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली.शेतकरी आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि त्याच प्रमाणे महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
महात्मा जोतीराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 साली सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई. पेशवांच्या काळामध्ये त्यांचे वडील आणि चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते,त्यामुळे गोऱ्हे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी पुणे ते फुले म्हणून ओळखू लागले आणि तेच नाव पुढे रूढ झाले.
जोतीराव केवळ नऊ महिन्याचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला .इ.स.१८४२ साली माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला आणि बुद्धी तल्लख असल्याने पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
मानवी हक्कावर इ.स.1791 मध्ये थॉमस पेन यांचे पुस्तक त्यांच्या वाचनात आले.त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले.त्यामुळेच सामाजिक विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागास जातीतील मुलामुलींचे शिक्षण यावर भर दिला.सामाजिक भेदभाव शिक्षणामुळे दूर होईल असे त्यांचे ठाम मत आणि अनुमान होते.शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली .समाजातील विषमता नष्ट करणे आणि शिक्षणापासून वंचित राहिलेल्याना शिक्षण पोहचवणे हे या सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.सत्यशोधक समाज संस्थेचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते.वेदांना झुगारून त्यांनी कार्य करण्यास सुरुवात केली त्याचप्रमाणे जातीय भेद आणि स्पृश्य अस्पृश्य भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.सत्यशोधक समाज या संस्थांचे स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले.सावित्रीबाई यांच्याबरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य केले.छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.उच्चवर्णीयांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून आणि गुलामगिरीतून शुद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.या समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली आणि मराठीत मंगलाष्टके लिहिली.
सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो.या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवले जाते.महात्मा फुलें यांचे लेखन साहित्य
1) १८५५ साली तृतीय रत्न नाटक
२)१८८५ साली इशारा
३) १८६९ साली ब्राम्हणांचे कसब
४)१८९१ साली। सार्वजनिक सत्यधर्म
५)१८७३ साली गुलामगिरी
६)१८८३ साली शेतकऱ्यांचा आसूड
महात्मा फुले यांच्या कार्याची दखल घेऊन लोकांनी त्यांना महात्मा ही उपाधी बहाल केली